पणजी :वृत्तसंस्था
तौक्ते चक्रीवादळ रविवारी गोव्याच्या किनार्यावर धडकले असून, याठिकाणी समुद्रात उंच लाटा उसळ्या आहेत. गोव्याच्या किनार्यावर वादळी वार्याने निसर्गाचे रौद्र रुप धारण केले आहे. वादळासह मुसळधार पाऊस देखील गोव्याच्या किनारपट्टी परिसरात सुरू असल्याने आपत्ती व्यवस्थापनची टीम अलर्ट आहे. किनारी परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे.
दरम्यान पुढील दोन दिवस रायगडसह कोकणासाठी धोक्याचे आहेत.हे चक्रीवादळ कोणत्याही क्षणी सिंधुदुर्ग,रत्नागिरीच्या किनार्यावर धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.रायगडातील सर्वत्र सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत.हवामान खात्याने दिलेल्या इशार्या नंतर दादरा नगर हवेली, दमन दीव आदी समुद्र किनार्यावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. येथून हे चक्रीवादळ मोठे तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. 18 मेच्या दुपारी पोरबंदर, गुजरातचे तट पार करण्याची शक्यता आहे.
गुजरात किनार्यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पाऊस पडू लागलायं. त्याचवेळी जोरदार वारेही वाहत असून, ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आले आहे.
दोन दिवस धोक्याचे
18 मेच्या संध्याकाळपर्यंत ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या घडामोडी लक्षात घेता आता महाराष्ट्रासाठी इशार्याची तीव्रता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अद्ययावत पूर्वानुमानानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी तसेच पुणे जिल्ह्याला सोमवारसाठी ऑरेंज अॅलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. येणार्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.