। जम्मू । वृत्तसंस्था ।
भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेच्या नजीकच्या उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांनी अलिकडेच पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. भारतीय लष्कराने ऑपरेशनमध्ये मारलेल्या दहशतवाद्यांकडून 5 एके -47, 8 पिस्तूल आणि 70 हँड ग्रेनेड जप्त केले आहेत. याबाबतची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. पहाटेच्या वेळी हातलंगा जंगल, रामपूर सेक्टरमध्ये काही संदिग्ध हालचाली दिसून आल्या. त्यानंतर केलेल्या ऑपरेशनमध्ये, 3 दहशतवाद्यांना निष्प्रभ करून त्यांचा हा घातपाताचा प्रयत्न संपवला गेला. असाच एक प्रयत्न 18 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता, जो फसला होता, अशी माहिती चिनार कॉर्प्स कमांडर जनरल डीपी पांडे यांनी दिली आहे.