कोरोना काळात लग्न जुळणे आणि करणे या अत्यंत अवघड गोष्टी झाल्या आहेत. लग्न जुळल तर त्यासाठी येणारा खर्च हा पेलवणं अनेकांना शक्य होत नाहीये. तरीही काही लोकांना राजेशाही थाटात लग्न करायच असतं. अशाच एका दाम्पत्यामुळे वर्हाड्यांना आणि लग्नाला येणार्यांच्या डोक्याला ताप झाला. रेडीत नावाच्या सोशल मिडिया मंचावर या लग्नाला हजर असलेल्या महिलेने नेमका काय त्रास झाला आहे, हे सविस्तर पद्धतीने सांगितलं आहे. ही घटना इंग्लंडमधली असल्याचं कळालं असली तरी नेमक्या कुठल्या शहरात घडली आहे, हे कळू शकलेलं नाहीये.
बापानेच घेतला लेकराचा जीव; आईस्क्रीममधून दिलं विष
या महिलेने पोस्टमध्ये लिहिलंय की ‘नववधू’ आणि वराने जवळपास सगळा पैसा लग्नस्थळावर आणि नवरीच्या गाऊनवर खर्च केला. खर्च जास्त झाल्याने आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढायचं काम या नवरा बायकोनेच केले. या महिलेने पुढे म्हटलंय की, ‘लग्न लागल्यानंतर रिसेन्शनची सगळ्यांना उत्सुकता हाती. तेवढ्यात नववधूची एक मैत्रिण धावपळीत आली, आणि आम्हांला उद्देशून म्हणाली की थोडी मदत हवी आहे. ती या महिलेसह अन्य काही लोकांना स्वयंपाकघरात घेऊन गेली. तिथे एसी नव्हता ज्यामुळे जाम उकडत होतं असं या महिलेने तिच्या पोस्टमध्ये म्हटंलय. तिथे खरकट्या भांड्यांचा ढीग पडला होता. जो आम्हाला धुवायला दिला गेला असं महिलेन तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नवदाम्पत्याने लग्नासाठीच्या जेवणासाठी भांडीकुंडी भाड्याने मागवली होती. ती साफ करून परत दिली नाही तर अनामत रक्कम जप्त केली जाणार होती. सगळे पैसे थाटमाटावर उडवल्याने भांडी घासण्यासाठी माणूस बोलवायला पैसेच उरले नव्हते. यामुळे नवदाम्पत्याने अनामत रक्कत वाचवण्यासाठी लग्नाला आलेल्या लोकांनाच भांडी घासायला जुंपलं होतं. फारसे पैसे नसल्याने जोडप्याने जेवण देखील थोडंचे मागवलं होतं. यामुळे लग्नाला आलेले बरेच जण उपाशी पोटी किंवा अर्धवट पोट भरलेल्या अवस्थेत परतले होते.