महाड | वार्ताहर |
सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे मंडणगड- तिडे-तळेघर-नालासोपारा या बससेवेच्या मार्गात दि. 4 जुलैपासून बदल करण्यात आला आहे. ही बससेवा मंडणगड येथून 13.30 वा सुटून केळवत, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, म्हाप्रळ, आंबेत, पुरार, श्रीवर्धन फाटा, गोरेगाव, लोणेरे, माणगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणे, वडखळ, रामवाडी, पनवेल, कोकणभवन, नेरूळ जुईनगर, कळवा नाका, ठाणे खोपट, घोडबंदर, वसई फाटा, नालासोपारा येथे 9.30 वा पोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता नालासोपारा येथून स.06:30 वा सुटणार आहे. मार्गात बदल केला असल्याने प्रवासाचा वेळ एक तास कमी होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना 24 कि.मी.चा तिकिटांचा अतिरिक्त भार पडत होता. तो कमी होणार आहे.