चिपळूण | प्रतिनिधी |
ढगफुटीसदृश्य पावसामुळे चिपळूणकरांचे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त पीडितांचे लवकरात लवकर पुनर्वसन होण्यासाठी केंद्र सरकराकडे मागणी करू अशी ग्वाही राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. मंगळवारी ते चिपळूण दौर्यावर होते. यावेळी मृत्युमुखी पडलेल्यांना राज्यपालांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान या दौर्यात त्यांनी चिपळूण शहराची पाहणी केली. यावेळी चिपळूणातील व्यापार्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले आहे. लवकरच पुनर्वसन व्हावं म्हणून केंद्राशी संपर्क करणार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चिपळूण पूरग्रस्तांसाठी केंद्र शासनाकडून लवकरात लवकर मिळवून देऊ. आम्ही सर्व चिपळूणकरांच्या सोबत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून योग्य ती मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. या घटनेबाबत लोकांतून आक्रोश होत आहे. तो आक्रोश होणे स्वाभाविक आहे. परंतु या परिस्थितीत थोडा धीर धरणे गरजेचे आहे. संपूर्ण देश चिपळूणकरांच्या सोबत आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.