जीवनावश्यक वस्तुंची टंचाई
। महाड । प्रतिनिधी ।
अतिवृष्टी नंतर महाड तालुक्यांतील ग्रामिण भांगातील रस्त्याची पुर्ण दुरावस्था झाली असुन अनेक गांवाना जोडणारा रस्ता वाहून गेल्याने तर कांही रस्ते खचल्याने दळणवळणाची समस्या निर्माण झाली आहे.महाड बिरवाडी वारंगी या रस्त्याचा शंभार पुैटा पेक्षा अधिक भाग पुराने वाहून गेल्याने या परिसरांतील अनेक गावांंचा संपर्क तुटला आहे.
महाड आणि पोलादपुर तालुक्यासह कोकणांमध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये जीवीत हानी बरोबर वित्त हानी देखिल प्रचंड प्रमाणांत झाली असुन जनजीवन पुर्व पदावर येण्या करीता कांही काळ जाणार असुन जे या आपत्तीमध्ये निराधार झाले आहेंत. अतिवृष्टीमध्ये पाण्याचा प्रवाह अत्यत वेगाने वाहान असल्याने तालुक्यातील दुर्गम भागांतील आठ ठिकाणचे रस्ते खचले असुन कांही ठिकाणी डोगरातील भराव रस्त्यावर आल्याने रस्ते वाहातुकीला बंद झाले आहेंत.बिरवाडी ढालकाठी हा पुल कोसळल्याने दोन्ही गावां बरोबर अनेक गावांवा संपर्क तुटला असुन नागरिकाना अन्य मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
बिरवाडी,खरवली,वाळण,आद्राई,शेवते,वारंगी या गावांना जोडणारा रस्ता पुर्णपणे खचल्याने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी विकास गोगावले यांनी केली आहे.वारंगी,वाळण,मांघरुण,पंधेरी,पाने या गावाना भेट देऊन नुकसानीची पहाणी केली.नागरिकांच्या नुकसानीचे पंचनाते तातडीने करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.तातडीची मदत म्हणुन या परिसरांतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप त्यांनी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.महाड शहरांतील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु होण्यास बराच काळ जाणार असुन बिरवाडी सह अन्य ग्रामिण भागांतील बाजार पेठा अतिवृष्टीमुळे बंद पडल्या असल्याची माहिती विकास गोंगावले यांनी दिली.