चौक | वार्ताहर |
सणासुदीला गावातील स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी असे वाटत असतानाच ग्रामपंचायत वावंढळ यांनी कापलेले गवत रस्त्यावरून न उचलल्याचे चालणे अवघड आहे.
ग्रामपंचायत वावंढळ यांनी गणपती उत्सव साजरा करण्यात यावा म्हणून गावातील रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेले गवत काढण्यासाठी सुरुवात केली आहे, मात्र गणपती आगमनापूर्वी हे गवत कापले जात असताना ते उचलण्याची तसदी न घेतल्याने त्यावरून चालणे अवघड झाले आहे. त्यातच सतत पडणार पाऊस यामुळे गवताचा चिखल होत आहे. हे गवत कापण्यातदेखील नियोजन नसल्याने कसेही कापले जात आहे, अनेक ठिकाणी तसेच गवत आहे,याबाबत माहिती घेतली असता सरपंच यांनी स्वतःच निर्णय घेतला असून ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांना माहीत नाही, तर कोणताच निर्णय घेताना सरपंच कुणालाच विचारात घेत नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून होत आहे. त्यांच्या विरोधात खालापूर पंचायत समितीकडे लेखी तक्रार करूनसुद्धा त्यांनीही दखल घेतली नाही, त्यामुळे सरपंच मनमानी कारभार करीत असून, होत असलेल्या भ्रष्टाचार व अनियमितपणा याला जबाबदार स्वतः सरपंच व पंचायत समिती खालापूर असल्याचा आरोपही सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे.