सारळ परिसरातील ग्रामस्थांची मागणी
। अलिबाग । वार्ताहर ।
गएोशोत्सव जवळ आल्याने खारेपाट विभागातील ग्रामस्थांमध्ये एकाबाजूला आनंदाचे वातावरण निमार्ण झालेले दिसत आहे. सारळ, मिळकतखार, बोडणी, नवखार, रेवस, पुपादेवी पाडा, बेलपाडा या विभागात घरगुती गणपतीची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे विर्सजनावेळी गदी कमी करण्यासाठी येथील समुद्रावर गणेशमुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करण्याची मागणी करण्यात येत आहे.
खारेपाटात गौरीगणपती, अनंत चतुर्थीच्या विसर्जनाला सारळ- मिळखतखार समुद्रकिनार्यावर परिसरात जास्तच गर्दी होते. याठिकाणी मुर्ती समुद्रात विसर्जन करताना भरतीची वेळ पाहून करावे लागते नाही तर विसर्जनानंतर मुर्ती किनार्यावरच राहण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे मुख्यतः विसर्जनसाठी समुद्रकिनार्यावर साधारण खोलखड्डा करून कृत्रिम गणेशविसर्जन तलाव बनवला गेला तर या परिसरातील सर्वच ग्रामस्थांना गणेश विसर्जन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अशी भावना परिसरातील सर्वच गणेशभक्तांनी केली आहे. काही ठिकाणी गावातील तलावात विसर्जन करण्यामुळे बंदिस्त तलावात फुले, पूजेचे साहित्य, कागद इत्यादी साहित्यत्यात पडत असल्याने पाण्याचे प्रदूषण लगेच होते. त्यादृष्टीने परिसरातील समाजसेवक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन या परिसरासाठी समुद्रकिनारी गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलाव करावा अशी मागणी या परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी केली आहे.