। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. सध्या जिल्हा चौथ्या टप्प्यात असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 14.12 टक्के इतका आहे. कोरोना पॉझिटिव्ह वाढवणे,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक सुयोग्य आणि अधिक क्षमतेने करणे, कोरोना बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. कोरोनाची लक्षणे असलेले नागरीक कोरोना चाचणी करण्यासाठी तयार नसतील, विरोध करत असतील तर विरोध करणार्या नागरीकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
त्यामध्ये जास्तीत जास्त टेस्टींग करुन टेस्टींगची संख्या वाढवली जाईल, त्यामुळे बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल. रत्नागिरी जिल्ह्यात बरेचसे लोक लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव जास्त होत आहे. म्हणून नागरीकांनी पुढाकार घेऊन टेस्ट करुन घेणे गरजेचे आहे. कोणत्याही गावात किंवा शहरात कोरोनाचे लक्षण असलेले लोक टेस्टींगसाठी तयार होत नसतील किंवा विरोध करत असतील तर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या पथकाद्वारे विरोध करणार्या लोकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमुळे अधिक फैलाव होणार नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वतः पुढे आले पाहिजे. स्वतःसह आपल्या जवळच्या लोकांनाही धोका होणार नाही. यामुळे अदृश्य केसेस समोर येतील आणि होणारा फैलाव आटोक्यात येईल.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल, ज्यामुळे त्यांच्याद्वारे आणखी फैलाव होणार नाही. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्या ज्येष्ठ लोकांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आलेले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा योग्य सोयी असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आणि लहान मुले असणार्या पालकांना जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार एकूण पाच निकषात बसणार्या लोकांना स्टॅम्पिंग करुन गृहविलगीकरणात राहता येईल.