। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महसूल विभागाच्या नियमित कामाच्या रगाड्यात कार्यरत राहून, आपली लेखनकला जिवंत ठेवत, सतत वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपल्या लेख, कविता, कथा यामधून समाजासाठी सतत सकारत्मक विचाराचे योगदान देणारे सारळ येथील श्रीकांत पांडुरंग कवळे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन अलिबाग येथील व्हेव सभागृहात चैतन्यमय वातावरणात संपन्न झाले.
पुस्तकाचे प्रकाशन मातोश्री सत्यवती कवळे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास साहित्य संमेलानेच माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त साधत त्यांनी आपले वडील स्वातंत्रसेनानी कै. पांडुरंग कवळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन समाजभूषण पुरस्कार कार्लेखिड येथील वृद्धाश्रमाचे मालक चालक अॅड.श्री व सौ. गुंजाळ यांना तर दुसरा पुरस्कार कवी रणखाबे यांना देण्यात आला. कार्यक्रमात जयपाल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मसापचे प्रतिनिधी शिरीष चिटणीस, शारदा प्रकाशनचे प्रा.संतोष राणे,निवासी नायब तहसीलदार अजित टोळकर,तहसीलदार प्रीतीलता कौरथी माने अॅड. प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे खुसखुशीत निवेदन डॉ. सुचिता पाटील यांनी आभार प्रदर्शन जगदीश कवळे यांनी केले.