पाताळगंगा | वार्ताहर |
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या,पायी हळू – हळू चाला मुखाने गजानन बोला,या जय घोषात पाच दिवसाच्या गणपती गौरी ला निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्य झाले होते.यामुळेच पाताळगंगा या ठिकाणचा परिसरात गणरायाच्या आवाजाने भक्तिमय झाले होते.विसर्जनाच्या ठिकाणी गणरायाची विसर्जनाची तयारी चालली असल्यामुळे फटक्याच्या आणि टाळ्यांच्या आवाजात गुळाला उधळून मोठ्या आनंदाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
बाप्पाच्या आगमनाच्या समवेत पावसाने हजेरी लावल्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजन पडले होते.मात्र विसर्जनाच्या दिवशी वरुन राजा बाप्पाला निरोप देण्यासाठी जणू तो अभिषेक करीत असल्याचा भास निर्माण झाला होता.दिड दिवसांचा बाप्पा हे घरघुती असल्यामुळे पावसाच्या पाण्यांच
अंदाज घेत लवकर तयारी करण्यात आली होती.पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला या भक्तीमय वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.