। मुंबई । प्रतिनिधी ।
30 सप्टेंबरपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातपर्यंत जाईल ज्यामुळे गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हे क्षेत्र अरबी समुद्रात गेल्यानंतर पुन्हा ह्या क्षेत्राचे रुपांतर अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ज्यात पुन्हा अरबी समुद्रात एक चक्रीवादळ 30 सप्टेंबरनंतर तयार होऊ शकतं. अशात, ह्या जर हे चक्रीवादळ तयार झाल्यास शाहीन असं ह्याचं नाव. असणार असून ते ओमानच्या दिशेने पुढे सरकेल. दरम्यान, अरबी समुद्रात जर चक्रीवादळ तयार झालं तर महाराष्ट्राला त्यापासून धोका नसेल.
दरम्यान,गुलाब चक्रीवादळामुळे मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ह्या दोन्ही विभागातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यातआला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात ह्या भागात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज असेल. दुसरीकडे, अरबी समुद्रात देखील वार्यांचा वेगअधिक असल्यानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.