मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एमएसबीएसएचएसई) महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात येणार आहे.दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.