। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर येथील कृष्णा म्हात्रे यांचा गुरांचा वाडा मंगळवारी रात्री आलेल्या पावसामुळे कोसळला. गोठ्यात बांधलेली एक म्हैस आणि तिचे वासरू थोडक्यात बचावले असून यात बांधलेल्या जनावरांची कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गोठ्यातील गुरांसाठी भरलेला 1000 पेंढा संपूर्ण भिजून गेल्याने गुरांच्या चार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जळण्यासाठी ठेनलेली लाकडे भिजून गेली आहेत. याशिवाय इतर लाकडी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चिरनेर सजाचे तलाठी यांच्या सांगण्यावरून कोतवाल यांनी कोसळल्या वाड्याची पाहणी करुन पंचनामा करून तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.