अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा वारसा पुढे चालू ठेवीत नाना पाटील यांच्या पाचव्या पिढीतील उगवते नेतृत्व शेकाप विद्यार्थी नेते युवराज नृपाल पाटील यांनी आपल्या मित्र मंडळीसोबत मुरुड मधील काशिद येथे गरजूंना किराणा सामान, अन्नधान्य, साड्या, कपडे, टॅब आणि शाळेय उपयोगी पुस्तकांचे वाटप केले.शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनीदुर्घटनास्थळी काल पाहणी करीत नुकसानग्रस्त कुटुंबियांना शेकाप सर्वोतोपरी मदत करेल असा शब्द दिला होता. त्याची तात्काळ पूर्तता केली.
युवराज पाटील आणि त्याचे मित्र सय्यम सांगवी, क्षितिज पाटील यांनी गरजू बांधवांना किराणा सामान, अन्नधान्य, साड्या, कपडे, टॅब आणि शाळेय उपयोगी पुस्तकांचे वाटप केले.यावेळी रिझवान फहिम, अजित कासार, शरद चवरकर, राहील कडू, महेश पाटील इतर शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पर सेवा दिल्या बद्दल मोहन धुमाळ आणि मधू ढेबे यांना यावेळी धन्यवाद दिले आहेत.नुकसानग्रस्तांच्या सोबत शेकापकाल पण होता, आज पण आहे आणि उद्या सुद्धा असेल. आमची नाळ तळागाळातील जनतेच्या भावनांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे आपल्या बांधवांना मदत करणे हे आमचे कर्तव्य समजतो असे यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.