कमिशन मागणार्यांना शेकाप कार्यकर्ते आडवे करतील-आ. जयंत पाटील
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग रामराज रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, जो अलिबाग रोहा रस्ता आपण 225 कोटी करुन निवीदा काढल्या. या रस्त्याची वर्क ऑडर काढली. मात्र कंत्राटदार आल्यावर आणि आपली आमदारकी गेल्यानंतर कोण दहा टक्के मागतोय कोण 25 टक्के मागतोय मात्र रस्ता तसाच राहीला आहे. रस्त्याचे पुन्हा नारळ फोडले गेले. 40 वर्षात केला नाही असा गाजावाजा करुन सांगण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्यक्षात यांनी काहीच केले नाही. आपणच वर्क ऑर्डर आणली. गडकरींकडून पैसे आणले. पण आता आपण याचा पाठपुरावा करणार आहोत हे जाहिररित्या सांगतोय. या रस्त्याचे काम आपण पावसाळ्यानंतर सुरु करणार आहोत. रस्ता आपण मंजूर करायचा, खड्डे आपणच भरायचे आणि मागावून आपण खड्डे भरायला गेलो की यांनी अडवायला यायचे. लोकांना पण फरक कळू दे. काय बदल केला की काय होते ते. हा रस्ता आपण रामराज विभागातील कार्यकर्त्यांनी सांगा. आम्ही निर्णय घेतला आहे की बंद पडलेले काम पावसाळा संपल्यानंतर लगेच चालु करतोय. चालु करायला भाग पाडू. नाहीतर वेगळया तर्हेचे काम करु. त्यांना करता आले नाही. नाही केले आज आपली घोषणा रामराज विभागात गावोगावी सांगा. हा रस्ता आजपासून शेकापक्षाने जो मंजूर करुन आणलाय तो पुर्ण करायला भाग पाडू. सुरुवात करु. कोण पैसे कमिशन मागायला येतील त्यांना शेकापक्षाचे कार्यकर्ते आडवे करण्याचे काम शेकापक्षाचे कार्यकर्ते कमी पडणार नाहीत हे देखील ठणकावून सांगा असे आवाहन जयंत पाटील यांनी दिले.