कराड | प्रतिनिधी |
गेल्या चार दिवसापासून पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणात 102 टीएमसी पाणी साठा झाला असून चांदोली धरण काठोकाठ भरण्याची केवळ औपचारिकताच उरली आहे. गेल्या चार दिवसापासून पश्चिाम घाटात पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर कोयना, चांदोलीसह राधानगरी, दूधगंगा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. कोयना धरणात 102 टीएमसी पाणीसाठा झाला असून साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. 34.40 टीएमसी क्षमतेच्या चांदोली धरणामध्ये 34.35 टीएमसी पाणी साठले आहे. धरण काठोकाठ भरण्यास केवळ 0.05 टीएमसी पाणी कमी असून धरणातून 2 हजार 323 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.