| महाड | प्रतिनिधी |
दासगाव गाव हद्दीत निसर्ग हॉटेलमोर विरार वरून संगमेश्वर कडे जाणाऱ्या कारला रविवारी (दि.30) सकाळी अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर वर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
चालक प्रफुलचंद्र गंगाराम पवार हे आपली कार घेऊन विरार ते संगमेश्वर असा प्रवास करीत होते. सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास दासगाव हद्दीत आल्या नंतर कार (जीजे-18-बीसी-2392) वरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला धडकली. सदर वाहनांमध्ये चालक प्रफुलचंद्र गंगाराम पवार, प्रतीक्षा प्रफुलचंद्र पवार, यश पवार, आर्यन पवार, महमद उमर असे पाच जण प्रवास करत होते. अपघातानंतर कार रस्त्यावरच पलटी झाली. जवळच असलेल्या गणेश नगर या वाडीतील नागरीकांनी कार सरळ करत सर्वांना बाहेर काढले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग सुरळीत केला.