देशात पुन्हा कोरोना वाढला

रुग्ण संख्या 50 हजारांच्यावर
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दोन दिवस रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत आल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढून 50 हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 50,040 रुग्णांची भर पडली आहे तर 1258 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी दरात वाढ झाली असून तो 96.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात अजूनही 5,86,403 सक्रिय रुग्ण आहेत.

शनिवारी देशात 48,698 रुग्णांची भर पडली होती तर 1183 लोकांचा मृत्यू झाला होता. काल एका दिवसात 64 लाख 25 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण 32 कोटी 17 लाखाहून जास्त कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत. राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,752 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिसर्‍या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात आता बरे होणार्‍यांची संख्या आता 57,81,551 इतकी झाली आहे. आज 179 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 1,21,151 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.


12 ते 18 वयोगटातील मुलांना लस
येत्या काही दिवसांत देशातील 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितली आहे. केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्रक न्यायालयात सादर केलं असून त्यात असंही सांगितलं आहे की, 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी कोरोना लसीचे 186.6 कोटी डोस आवश्यक आहेत. नूर्वीी उरवळश्रर ची नूउेत-ऊ ही लस जगातील पहिलीच डीएनए आधारित लस आहे. झायडस कॅडिलाच्या लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली असून ती आता मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. भारतातील 18 वर्षांवरील लोकसंख्या ही अंदाजे 93 ते 94 कोटी इतकी आहे. त्यामुळे त्याच्या लसीकरणासाठी 186 ते 188 कोटी डोस लागतील असा अंदाज केंद्र सरकारला आहे

Exit mobile version