| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाकूर म्हणाले की, मंत्रिमंडळाने गव्हाच्या एम.एस.पी.मध्ये 110 रुपये, बार्ली 100 रुपये, हरभरा 105 रुपये, मसूर 50 रुपये, मोहरी 400 रुपयांनी आणि करडईमध्ये 209 रुपयांची वाढ केली आहे.
या वाढीनंतर आता गव्हाच्या एम.एस.पी.मध्ये 2125 रुपये प्रति क्विंटल, बार्लीच्या एम.एस.पी.मध्ये 1735 रुपये प्रति क्विंटल, हरभर्याच्या एम.एस.पी.मध्ये 5335 रुपये प्रति क्विंटल, मसूरच्या एम.एस.पी.मध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटल, मोहरीच्या एम.एस.पी.मध्ये 5450 रुपयांची आणि एम.एस.पी.मध्ये 5450 रुपयांची वाढ झाली आहे. करडईचे भाव 5650 रुपये प्रति क्विंटल झाले.
मसूरचा एम.एस.पी. प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढवून 6,000 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारकडून रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा एम.एस.पी. (किमान आधारभूत किंमत) जाहीर केली जाते. ऊसाची आधारभूत किंमत ऊस आयोग ठरवतो.
शेतकर्यांना दिलासा मिळेल
शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय 2018-19 च्या अर्थसंकल्पाच्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी घेण्यात आला आहे.