| मुंबई | प्रतिनिधी |
आगामी काळात होणार्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने झोपडपट्टीवासियांसाठी अवघ्या अडीच लाखात घर देण्याची घोषणा केलेली आहे. सरकारने एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या दोन लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टी असलेल्या जागांचा विकास होणार आहे. राज्य जारी केलेल्या निर्णयानुसार, या नव्या योजनेतील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे देण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी गेमचेंजर?
आगामी काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणूक लक्षात घेता, राज्य सरकारकडून सातत्याने मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महत्त्वाच्या महापालिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. मुंबईतील 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या कालावधीतील झोपडपट्टीधारकांना आता अडीच लाखात घरं देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा लाखो झोपडपट्टीवासियांना होणार आहे. मुंबईत अडीच लाखात हक्काचे घरं देण्याचा निर्णय मोठा गेमचेंजर ठरू शकतो.