| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माणगावजवळ गुरुवारी पहाटे घडलेल्या अपघाताने आख्खे कुटुंबच उद्धवस्थ झाले असून, राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळेच अशा भयंकर घटना घडत आहेत, यामुऴे राज्यकर्त्यांविषयी कोकणवासियांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाल्याची असल्याची टीका शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.
माणगावनजीक झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि ह्दयद्रावक अशी आहे. असे अनेक अपघात आतापर्यंत या महामार्गावर झालेले असून, असंख्य कुटुंबे अशी उद्धवस्थ झाली असल्याबद्दल पंडित पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वास्तविक कोकणाला जोडणारा हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्यात आतापर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांना अपयश आलेले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे दावोसमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय उद्योगांशी चर्चा करतात. पण त्याच राज्यकर्त्यांना कोकणातील रस्ते करायला सुचत नाही हे आपले दुर्दैव म्हटले पाहिजे. सरकारने प्रकल्प आणावेत, पण ते आणताना आधी रस्त्यांची निर्मिती करावी अशी मागणीही त्यांनी केली.
काशिदमध्येही गेल्या आठवड्यात घडलेल्या दुर्घटनेचा उल्लेख करुन सरकारने याबाबत ठोस उपाययोजना शोधून नाहक जाणारे प्राण वाचवावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.