रत्नागिरी
। कुडाळ । वृत्तसंस्था ।
सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी कोकण म्हाडातर्गंत तातडीने विशेषबाब म्हणून 50 बेडचे कोवीड सेंटर उभारावे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचेकडे मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रोज रूग्ण संख्येत वाढ होत आहे.तसेच सिंधूदूर्ग जिल्हा हा अतीदुर्गम भाग आहे.कोरोना रूग्णांना या ठिकाणी आवश्यक उपचार करण्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे कोवीड रूग्णांना वेळीच उपचार मिळण्यास अडचणी येतात.ही समस्या दूर करण्यासाठी सिंधूदूर्ग जिल्ह्यातील विवीध स्तरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सिंधूदूर्ग जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रूग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत या मागणीमुळे जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे स्वःत तातडीने मुंबईला जाऊन गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची भेट घेतली व सिंधूदूर्ग जिल्ह्यात 50 बेडचे कोवीड सेंटर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरसह कोकण म्हाडा विभागातर्फे उभारण्यात यावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र देऊन जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्यायावर चर्चा करून सविस्तर माहिती दिली.या मागणीनुसार सिंधूदूर्ग जिल्ह्यासाठी कोकण म्हाडा विभागा मार्फत कोरोना रूग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी तातडीने कोवीड सेंटर उभारून तेथील रूग्णांना वेळेत उपचार मिळणेसाठी खास बाब म्हणून सोय करण्यात येईल.असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना मंत्री आव्हाड यांनी सांगितले.