पळपूटं आणि भित्रं केंद्र सरकार

मुंबई

। मुंबई । विशेष प्रतिनिधी ।

मोर्चाला दोन महिने होत आहेत. मात्र अद्यापी केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे. त्यामुळे केंद्राच्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो. ही अंतिम टप्पाची लढाई असणार आहे. केंद्र सरकारने हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न केले. गुजरातची दंगल घडवून आणण्याचा डाव त्यांचा होता. पण मोदी सरकारला जमले नाही. हे लोकं दादागिरी करत आहेत. मात्र प्रत्यक्षात अत्यंत पळपुटे आणि अत्यंत भित्रे सरकार आहे. दिल्लीमध्ये शेतकर्‍यांचं आंदोलन सुरु आहे. संसदेमध्ये कठीण प्रश्‍नांना उत्तर देता येणार नाही म्हणून केंद्र सरकारने या वेळेस हिवाळी अधिवेशन सुद्धा घेतले नाही. 

Exit mobile version