| उरण | प्रतिनिधी |
दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून उरण येथील विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने हजारो वृक्षलागवडीतून निसर्गसेवेतून लोकनेते दि. बा. पाटील स्मृतीवन साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत संस्थेनी उरण वनविभाग, स्थानिक आमदारांना निवेदन पत्र देऊन स्मृतीवनासाठी आवश्यक जागेची मागणी केली आहे. उरण तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय वनअधिकारी अलिबाग यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले की लवकरच राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांची भेट घेऊन स्मृतीवनाचा संकल्प आराखडा सादर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबधित विभागाशी पाठपुरवठा करून दिबांचे स्मृतीवन प्रकल्प येत्या 24 जून रोजी दिबांच्या पुण्यस्मरण दिनी वृक्षरोपणास सुरूवात करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, दि.बा. पाटील याांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून साकारण्यात येणाऱ्या स्मृतीवनात सर्व प्रकारची स्थानिक देशी झाडांचा समावेश असणार आहे. हे स्मृतीवन पक्षी प्रेमींसाठी लाभदायक ठरेल. स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अधिक परिश्रम घेतले जातील. तसेच पर्यटनयुक्त निसर्ग सौंदर्याने नटलेले असे स्मृतीवन असेल असे थोडक्यात मत व्यक्त केले.







