देशातील 1.6 कोटी लोकांना दुसरा डोस नाही

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतातील किमान 1.6 कोटी लोकांना त्यांच्या कोरोना लसीच्या पहिल्या डोसच्या 16 आठवड्यांनंतरही लसीचा दुसरा डोस मिळणे अद्याप बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त वृद्ध आहेत. बाकीचे इतर आरोग्य आणि फ्रंन्टलाईन कर्मचारी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आहेत. 1.6 कोटींचा आकडा 16 आठवड्यांपूर्वी किती लोकांना पहिला डोस मिळाला होता हे पाहून आणि आतापर्यंत दुसरा डोस मिळवलेल्या एकूण लोकांशी तुलना करून काढला गेला. सर्व आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून समोर आली आहे.
सरकारने कोविशिल्डसाठी 12-16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याची मान्यता दिली होती. जी सर्व लसीकरणांपैकी 85 टक्के पेक्षा जास्त आहे. कोव्हॅक्सिनसाठी हे अंतर 4 ते 6 आठवडे आहे. ज्या लोकांचा दुसरा डोस दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा झाले आहेत त्यांची संख्या जास्त असू शकते कारण 16 आठवड्यांची आकडेवारी ही कोविशिल्डसाठीच्या 16 आठवड्यांवर आधारित आहे आणि कोव्हॅक्सिनसाठीच्या सहा आठवड्यांवर नाही. म्हणूनच, ज्यांना आतापर्यंत दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यामध्ये 2 मे नंतर पहिला डोस मिळवलेल्या अनेकांचा समावेश आहे.

Exit mobile version