। जयपूर । वृत्तसंस्था ।
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. श्रीबालाजी गावाजवळ ट्रक आणि क्रूझरची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की घटनास्थळीच 11 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी रवाना झाले आहेत. नेमका हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोवण्यात आले आहे.