| रत्नागिरी | प्रतिनिधी |
चिपळूण येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. यामध्ये 468 प्रलंबित प्रकरणे व 930 वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात विविध बँका, पतसंस्था, महावितरण, इतर वित्तीय संस्था आणि नुकसानभरपाईचे अर्ज तसेच कौटुंबिक हिंसाचाराची व पोटगीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील 468 पैकी 156 प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणात 1 कोटी 38 हजार 282 रुपयांची तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच, 28 वादपूर्व प्रकरणात 36 लाख 18 हजार 882 रुपयांच्या रकमेवर तडजोड होऊन वसुली झाली. यासाठी न्यायाधीश व वकिलांचे तीन पॅनेल कार्यरत होते. लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, दिवाणी न्यायाधीश पी. आर. कुलकर्णी, सह. दिवाणी न्यायाधीश एम. आर. काळे, पॅनेल विधीज्ञ ॲड. एन. जी. लाड, ॲड. एन. एस. सावंत, ॲड. नयना पवार यांनी काम पाहिले.