। नेरळ । प्रतिनिधी ।
पाचवी आणि आठवीमधील शिष्यवृत्ती परीक्षेत 30 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. तालुक्यातुन परीक्षेला बसलेल्या एकूण 618 विद्यार्थ्यांपैकी 141 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पाचवीमध्ये नऊ तर आठवीमध्ये 21 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कर्जत तालुक्यात 618 विद्यार्थी बसले होते. पाचवीमध्ये परीक्षेला बसलेल्या 421 विद्यार्थ्यांपैकी 87 विद्यार्थी हे पात्र ठरले आहेत. त्यातील केवळ नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. पाचवीमध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्यात चौथी येण्याचं मान गौळवाडी जिल्हा परिषद शाळेतील सारस्वत अमोल साखरे 85.03 टक्के गुण मिळवून तालुक्यात पहिला नंबर मिळविला. श्रवंती शिवानंद मैंदगर्दी- 70 टक्के, वैष्णवी योगेश चंचे 64.62 टक्के , आरोही नितीन गाडे 62.58 टक्के, अरहन सय्यद 61.90 टक्के, सैफ अन्सारी 59.18 टक्के, कौस्तुभ भंडारे 58 टक्के, प्रथम ढोले 55 टक्के आणि अथांग प्रताप गीते 70.46 टक्के गुण मिळवून पात्र ठरला आहे.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळचा रुद्र संतोष परटोले 63.75 टक्के गुण मिळवून तालुक्यात पहिला आणि जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळविला. संस्कृती दिनेश महाजन 59.73 टक्के, देविका कर्णिक 56.37 टक्के, सना अन्सारी 55.03 टक्के, सफल मयूर ठक्कर 54.36 टक्के, नुपूर प्रमोद गाडे 53.69 टक्के, सायली मुंढे 53.02, गार्गी मयुरेश पोतदार 52. 34 टक्के, शर्वाणी जगन्नाथ शिंदे 50.33 टक्के, शर्वाणी रामदास निमणे 50.33 टक्के, शर्वाणी प्रवीण मते 49.66 टक्के, निधी विजय जोवील 49.66 टक्के, वेदिका विजय जाधव 49.64 टक्के, आयुष्य तुकाराम बुंधाटे, तन्वी संपत चव्हाण 63. 75 टक्के, श्रेयस अतुल रेंगे 55.70 टक्के, श्लोक मनीष परमार 53.69 टक्के , श्वेता राजन कडू 48.99 टक्के, वेदिका मनीष ठाणगे 48. 99 टक्के आणि समरन केशव राऊत 48.99 टक्के तसेच अनुसूचित जाती विभागात श्रेयस रोहिदास सोनावणे 47.65 टक्के गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरले असल्याची माहिती कर्जत शिक्षण विभागाने दिली आहे.