। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतात सन 2020 मध्ये अंमली पदार्थ आणि दारू यांच्या व्यसनाधीतेमुळे होणार्या आत्महत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अंमली पदार्थ आणि दारूचं व्यसन करणार्यांनी आत्महत्या केल्याची 9000 प्रकरणं समोर आली आहेत.
2020 मध्ये 1.5 लाखांहून अधिक आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये हा आकडा 6% होता. याच वर्षात दारू आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळं झालेल्या आत्महत्यांच्या 9,169 घटनांपैकी 3,956 प्रकरणं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील होती. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार, 2015 पासून महाराष्ट्रानं या यादीत अव्वल स्थान पटकावलंय, तर कर्नाटकातील प्रकरणांमध्येही सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं हे राज्य 2018 पासून दुसर्या क्रमांकावर आहे.
मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं, की दारू आणि ड्रग्जमुळं लोकांची मानसिक स्थिती बिघडते. शिवाय आर्थिक संकट, कौटुंबिक समस्यांमुळं अनेक व्यक्ती हा मार्ग निवडतात.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (छउठइ) छरींळेपरश्र उीळाश ठशलेीवी र्इीीशर्री आकडेवारीनुसार, ड्रग्ज आणि अल्कोहोलमुळं गेल्या वर्षभरात 7,860 आत्महत्या झाल्या आहे. त्यात 2020 मध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दर तासाला किमान एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अशा 43 टक्क्यांहून अधिक प्रकरणं नोंदली गेली आहेत. या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्येही गेल्या काही वर्षांत सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.