• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

भोंदू डॉक्टर

Varsha Mehata by Varsha Mehata
August 16, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी ठाण्याच्या (कळवा) सरकारी इस्पितळात एका रात्रीत अठरा लोकांचा मृत्यू झाला. सध्या मूळ इस्पितळाचे काम चालू असल्याने कळवा इस्पितळावर अतिरिक्त रुग्णांचा भार पडला व त्यामुळे पुरेसे डॉक्टर्स व इतर कर्मचारी नाहीत असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, त्यातूनही मुंबईचे जोडशहर असलेल्या ठाण्याची ही अवस्था असेल तर बाकीच्या जिल्ह्यांमधील आरोग्य यंत्रणेची अवस्था काय असेल याची कल्पना केलेली बरी. रायगडवासियांना तर कल्पनाही करण्याची गरज नाही. अलिबागच्या सिव्हिल इस्पितळाची स्वतःचीच हालत आयसीयूमधल्या अतिगंभीर रुग्णासारखी आहे. त्याविषयी वेळोवेळी बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. अलिकडे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील दोन आदिवासी स्त्रियांची दूरवरून आणताना रस्त्यात प्रसूती झाल्याच्या बातम्या विधिमंडळात चर्चिल्या गेल्या होत्या. अशा घटना घडल्या की त्यांची तात्पुरती चर्चा होते. सेवेतील काही डॉक्टर्सवर खापर फुटते. पण बहुतेकदा या स्थितीला नोकरशाही यंत्रणाच जबाबदार असते. तिच्यावर कधीही कारवाई होत नाही. अशा प्रसंगातून अलगद सुटका करून घेण्याचे मार्ग या बाबू लोकांना अवगत असतात. एरवी वाद असले तरी, संकटामध्ये हे सगळे एकमेकांना बरोबर सांभाळून घेतात. सात वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोरखपूर या मुख्यमंत्र्यांच्या गावातील सरकारी इस्पितळात असेच साठ-सत्तर लोक काही तासांमध्ये मेले. त्यात बहुसंख्य मुले होती. या इस्पितळातला ऑक्सिजन संपला होता आणि त्याचा पुरवठा वेळेत सुरू करण्याची काळजी वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतली नव्हती. पुरवठादाराची पूर्वीची बिले याच अधिकार्‍यांनी कमिशनसाठी अडवून ठेवली होती. त्यामुळे तो पुरवठा करायला तयार नव्हता. या भांडणात अनेक लोकांचे जीव गेले याची कोणालाच पर्वा नव्हती. डॉ. कफील खान यांच्यामुळे हे मृत्यूकांड आणि त्यामागची भ्रष्टाचाराची साखळी उघड झाली. पण अखेर कफील यांच्यावरच कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि अधिकारी मात्र सहीसलामत राहिले.
आरोग्य सुधारण्यात अपयश
आपले सरकार गरिबांचे असल्याची टेप एकनाथ शिंदे नेहमी वाजवत असतात. कोणतीही दुर्घटना झाली की आपण तेथे लगेच कसे पोहोचतो याची जाहिरात चालू असते. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत अशा रीतीने जाहीर केली जाते की ती जणू काही एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फेच दिली जात आहे. मात्र खारघरमधील महाराष्ट्रभूषण पुरस्कारातील दुर्घटना असो की ठाण्यातील नुकताच घडलेला प्रकार असो, आपल्या व्यवस्थेला पडलेली भोके झाकता येत नाहीत. शिंदे इर्शाळवाडीत दोन तास चालत गेले म्हणून मुळात दुर्घटना का घडली हा प्रश्‍न टाळता येत नाही. हीच गोष्ट केंद्रात मोदींची. देशातील गरिबांसाठी आयुष्मान भारत योजना सुरू केल्याचा डिंडिम मोदी पिटत असतात. या योजनेतील अनेक भानगडी कॅगच्या ताज्या अहवालातून बाहेर आल्या आहेत. त्यानुसार, या योजनेत साडेसात लाख लाभार्थी असे आहेत की त्यांचा मोबाईल नंबर एकच आहे. नंबरही संशयास्पद आहे- दहा वेळा नऊ. अशाच रीतीने दहा वेळा आठ असलेल्या नंबरवर दीड लाख लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. उघडच हे सर्व लाभार्थी बोगस असण्याची दाट शक्यता आहे. कॅगच्या या ठपक्याची अत्यंत गंभीर दखल घेऊन चौकशी केली जायला हवी. पण दुसर्‍या कोणी वा विरोधकांनी केलेल्या आरोपांची अजिबात दखल न घेणे हेच मोदींचे आजवरचे धोरण राहिले आहे. याही वेळी ते तसेच होईल. गंमत म्हणजे हेच मोदी दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये भ्रष्टाचाराने आपल्या देशाला वाळवीसारखे कसे पोखरले आहे हे हमखास सांगतात. मोदींचे यंदाचे भाषण हे दहावे भाषण होते. त्यातही त्यांनी हे शब्द वापरले. अमेरिकी अध्यक्षांचा कालावधी आठच वर्षांचा असतो. मोदींना तर दहा वर्षे व तेही प्रचंड बहुमताने सत्ता लाभली. इतकी सत्ता असूनही त्यांना लोकांचे आणि देशाचे आरोग्य सुधारण्यात पूर्णपणे अपयश आले आहे.
पुन्हा तेच आरोग्य
भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोदींनी मनात आले तेव्हा एका रात्रीत हजारांच्या नोटा बंद करूनही झाले आहे. त्या फटक्याने अनेक व्यावसायिक पांगळे झाले. काही तर धंद्यातून बाहेर फेकले गेले. पण आपल्या निर्णयाचा असा दुष्परिणाम झाला हे मोदींनी आजतागायत मान्य केलेले नाही. आता तरी त्यांनी इतरांना दोष देणे बंद करायला हवे. यंदा त्यांनी पुन्हा एकवार घराणेशाहीवर टीका केली. पण घराणेशाहीतून राजकारण करणारे अनेक नेते खुद्द भाजपमध्ये आहेत. दुसरे म्हणजे ते ज्या गांधी घराण्याविषयी बोलतात त्यांच्यापैकी शेवटचे राजीव गांधी सत्तेत होते त्याला 33 वर्षे होऊन गेली. सोनिया गांधी या मनमोहनसिंगांच्या सरकारवर नियंत्रण ठेवून होत्या असा आरोप भाजपवाले करतात. मात्र या काळात गांधी कुटुंबियांच्या फायद्यासाठी अमुक एक निर्णय घेतला गेला किंवा त्यांनी विशिष्ट भ्रष्टाचार केला असे एकही उदाहरण बाहेर आलेले नाही. सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविषयी ओरड बरीच झाली. पण गेल्या दहा वर्षात त्यांच्याविरुध्दच्या खटल्यांमध्ये कारवाई का झाली नाही? नॅशनल हेरल्डसारखी प्रकरणे मधूनच सोईस्कररीत्या का व कशी प्रकट होत राहतात? सर्वात महत्वाचे म्हणजे दुसर्‍यांकडून चोख व्यवहाराची अपेक्षा करणार्‍या मोदींचा अदानीच्या बाबतीतील व्यवहार संशयास्पद का आहे? हिंडेनबर्ग अहवालात ठपका ठेवलेला असूनही अदानीच्या कंपन्यांमध्ये परदेशातून आलेल्या पैशांची चौकशी आजतागायत झालेली नाही. मोदींशी अदानीचा संबंध जोडला जाऊनही त्यांनी त्याबाबत काहीही खुलासा दिलेला नाही. आपल्याला लोक निवडून देत आहेत म्हणजेच आपण भ्रष्टाचारमुक्त आहोत असा मोदींचा समज व दावा आहे. मग हाच न्याय काँग्रेसला लावायचा झाल्यास गांधी घराणे व काँग्रेस यांना भूतकाळात लोकांनी वारंवार निवडून दिले. अगदी अलिकडे कर्नाटकातही विजय मिळाला. म्हणजे काँग्रेसवरील आरोप फिटले असा निष्कर्ष काढावा लागेल. लोक असो वा देश त्यांच्या आरोग्यावर उपचारांसाठी उत्तम यंत्रणा गरजेची आहे. जाहिरातबाजी करणारे भोंदू डॉक्टर उपयोगाचे नाहीत.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

पनवेलच्या मोहल्ला नाक्यावर प्रथमच ध्वजारोहण

Next Post

सरकारी कर्जे आणि विकास

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

सरकारी कर्जे आणि विकास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?