• Login
Friday, January 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय संपादकीय लेख

हवाई भरारी, आव्हानेही भारी…

Varsha Mehata by Varsha Mehata
December 18, 2023
in संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हेमंत देसाई

देशात मध्यम तसेच उच्चवर्गीयांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सतत भर पडत आहे. येत्या चार वर्षांमध्ये नागरी हवाई वाहतूक सेवेमार्फत भारतात 40 कोटी लोक प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसोबतच नागरी विमान वाहतूकही भारतातील दळणवळणाचा मोठा आधार बनणार आहे. हे होत असताना या क्षेत्राला कोणत्या बदलांना, आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे?

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सात डिसेंबर रोजी जगभरात ‌‘आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन’ साजरा झाला. जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. अखिल विश्वातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात नागरी उड्डाणाचे महत्त्व काय आहे, याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. भारतात शहरीकरण वाढले असून मध्यम तसेच उच्चवर्गीयांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे देशातील देशात विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सतत भर पडत आहे. तीन महिन्यांपूर्वी मुंबई ते अहमदाबाद या ‌‘आकासा एअर’च्या पहिल्या विमानसेवेचे उद्घाटन झाले. पूर्वी विमानाने प्रवास करणे केवळ उच्चभ्रू लोकांना शक्य होते. आता पूर्वीच्या तुलनेत परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास करणे शक्य होऊ लागले आहे. ‌‘उडान’ योजनेअंतर्गत 425 हवाई मार्ग आहेत. ते लवकरच एक हजारपर्यंत जातील. भारतात 68 नवे विमानतळ उभारण्यात आले असून लवकरच त्यांची संख्या शंभरवर नेण्यात येणार आहे. येत्या चार वर्षांमध्ये नागरी हवाई वाहतूक सेवेमार्फत भारतात 40 कोटी लोक प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीसोबतच नागरी विमान वाहतूकही भारतातील वाहतुकीचा मोठा आधार बनणार आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गोव्यातील नागरी हवाई वाहतूक सेवा संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आशिया पॅसिफिक परिषदेला संबोधित केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतीय नागरी हवाई वाहतूक क्षेत्र आगामी सात ते दहा वर्षांमध्ये प्रचंड गतीने वाढणार आहे. भारतीय हवाई वाहतूक उद्योग कोविडपूर्व प्रवासी वाहतुकीच्या जवळपास 95 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री विजयकुमार सिंग यांनी दिली. गोव्यातील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असून त्यामुळे गोव्यात पर्यटनाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली.
भारतीय लोक मोठ्या प्रमाणात जग पर्यटनाला बाहेर जातात. बड्या बड्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या जाहिराती आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहिला, तरी याची सहज कल्पना येते. हिवाळ्यात भारतात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये भारताची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रवासी संख्येच्या दृष्टीने कोविडपूर्व अवस्थेत पोहोचणे, ही आनंदवार्ताच मानायला हवी. एप्रिल ते डिसेंबर 2023 या सहामाहीमध्ये भारतात हवाईमार्गे येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि भारतातून बाहेर देशांमध्ये जाणारे प्रवासी यांची संख्या तीन कोटी 14 लाख इतकी झाली. मागच्या वर्षात हा आकडा तीन कोटी 13 लाख इतका होता. आंतरराष्ट्रीय प्रवासात 2022 पासूनच सुदृढ वाढ होऊ लागली होती. 2022-23 मध्ये भारतात येणाऱ्या आणि भारतातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास अडीच कोटींपर्यंत पोहोचली होती. मात्र 2020 मधील आकडेवारीच्या तुलनेत ही आकडेवारी 21 टक्कयांनी कमीच होती. भारतात ये-जा करणारे प्रवासी मुख्यतः परदेशी विमान कंपन्यांच्या विमानातून प्रवास करतात. परंतु तरीही गेल्या चार वर्षांमध्ये देशी विमान कंपन्यांच्या बाजारहिस्स्यामध्ये नऊ टक्कयांची वाढ झाली आहे. याचा अर्थ त्यांची कामगिरी किरकोळ मानता येणार नाही. अगोदर भारतीय विमान कंपन्यांचा बाजार हिस्सा 35 टक्के होता. तो आता 44 टक्के झाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण तीन कोटी 14 लाख प्रवाशांनी परदेशी प्रवास केला. त्यापैकी एक कोटी 39 लाख व्यक्तींनी भारतीय हवाई कंपन्यांमार्फत प्रवास केला.
इंडिगो आणि विस्तारा या खासगी कंपन्यांचा दबदबा अलिकडच्या काळात वाढला आहे. एअर इंडिया ही पूर्वी सरकारी कंपनी होती. आता ती टाटा समूहाचा एक भाग बनली आहे. तिनेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उलट ‌‘स्पाईसजेट’सारखी कंपनी अडचणीत असून तिचा बाजारहिस्सा घटला आहे. वाडिया समूहाच्या मालकीच्या ‌‘गो फर्स्ट’ या कंपनीचा व्यवसाय कमी झाला आहे. मे महिन्यापासून तर तिने आपला व्यवसाय स्थगित केला आहे. ‌‘एअर इंडिया एक्सप्रेस’ या एअर इंडियाच्या कंपनीतला बाजारपेठेतील वाटा घटला आहे. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाने आपले नेटवर्क विस्तारले असून क्षमतादेखील वाढवली आहे. काही विदेशी कंपन्यांच्या वाहतूक क्षमतेतही थोडी-बहुत वाढ झाली आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे काही नॉर्थ अमेरिकन कंपन्यांनी आपल्या विमानांच्या उड्डाणांमध्ये घट केली आहे. त्याचा फायदा भारतासारख्या देशांना होत आहे इंडिगोचा बाजारपेठेतील वाटा एक वर्षापूर्वी 15.7 टक्के होता. तो आता 17.8 टक्के झाला आहे. चार वर्षांपूर्वी तर तो फक्त दहा टक्के इतका होता. विस्ताराचा बाजारहिस्सा 0.1 टक्के होता. तो आता 3.2 टक्के इतका झाला आहे. एअर इंडियाचा वाटा 12.2 टक्कयांवरून 12.6 टक्के  इतका झाला आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि विस्तारा या तिन्ही कंपन्या टाटा समूहातील असून देशातले 23 टक्के प्रवासी या कंपन्यांच्या विमानांमधून प्रवास करतात. ‌‘स्पाइसजेट’चा बाजारपेठेतील वाटा 3.6 टक्कयांवरून 2.6 टक्कयांवर आला आहे. कार्यक्षमता, विश्वासार्हता, सुविधा, त्यांची गुणवत्ता अशा घटकांवर कोणतीही हवाई वाहतूक कंपनी लोकप्रिय ठरते.
भारतीय हवाई वाहतुकीतील भागधारक 2027 पर्यंत आपल्या ताफ्याचा आकार 1100 विमानांपर्यंत वाढवतील, असा अंदाज आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील सततच्या दुहेरी अंकी वाढीमुळे भारतात देखभाल, दुरुस्ती सेवा सुविधांची मागणी वाढत आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये विमान वाहतूक उद्योगाच्या विकासासाठी गुवाहाटीला आंतर-प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना आखली जात आहे. भारतीय विमानतळ महसुलात वाढ करण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) एरोट्रोपोलिस मॉडेलचे अनुकरण करत आहेत. हे मॉडेल किरकोळ विक्री, जाहिरात, वाहन पार्किंग, सुरक्षा उपकरणे आणि सेवांमधून उत्पन्न मिळवण्यावर लक्ष केंद्रित करते. दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरु येथील तीन सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीई) मॉडेल विमानतळांनी 2025 पर्यंत तीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांवर काम सुरू केले आहे. केंद्र सरकार 2030 पर्यंत भारताला हवाई वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या देशांपैकी एक बनवण्याचे स्वप्न पहात आहे. उत्तर प्रदेशमध्ये जेवार येथे ग्रीनफील्ड विमानतळ उभारले जात आहे. तिथे रोजगाराच्या संधी वाढतील आणि विमान उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले जाईल. त्यासाठी ‌‘उडान’ उपक्रमांतर्गत सुरू असलेले प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय उडान उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय विमानतळांची विद्यमान क्षमता वाढवणे गरजेचे आहे. विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सेवांसाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या उद्देशामुळे खर्चात बचत होईल आणि विमान कंपन्यांसाठी तरलता निर्माण होईल.
याव्यतिरिक्त, नागरी एमआरओ आणि संरक्षण क्षेत्र यांच्यातील अभिसरण मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकालीन फायद्यांची अर्थव्यवस्था निर्माण करू शकते. विमानचालन तंत्रज्ञानातील प्रगत संशोधनासाठी दीर्घकालीन योजना तयार केल्याने देशात उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यात मदत होईल. एविएशन उद्योगातील नवीनतम तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धती आत्मसात करण्यासाठी मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम), उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यात सहकार्य आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. वित्त वाढ एविएशन टर्बाईन फ्युएलची कर आकारणी आणि किंमत संरचना जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी आणि जागतिक मापदंडाशी सुसंगत करण्याचा विचार केला पाहिजे. सर्व प्रमुख केंद्रांमधील विमानतळ प्राधिकरण विमानतळांजवळील रिकाम्या जागांवर कमाई केली जाऊ शकते. या प्रदेशात स्वतःला ‌‘ट्रान्सशिपमेंट हब’ म्हणून स्थापित करून भारत अनेक फायदे मिळवू शकते. ते सेवा प्रदाता म्हणून भारताची व्यापार क्षमता वाढवेल, परकीय चलन कमावणारा देश म्हणून उदयास येईल आणि या प्रदेशात उत्तम कनेक्टिव्हिटी सक्षम करेल. 

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

संसदेतील दडपशाही

Next Post

मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांच्यासह ‘या’ खासदारांचे निलंबन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
संपादकीय

संक्रांतीचे संक्रमण – प्रकाशपूजेचे सूत्र!

January 14, 2024
पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर, तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना अद्याप एकही छदाम नाही
संपादकीय

आमचे ‌‘हिरो’ लोकनेते दि.बा. पाटील

January 12, 2024
पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर, तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना अद्याप एकही छदाम नाही
संपादकीय

न्यायालयाचा हिसका, राज्यकर्त्यांना चपराक

January 11, 2024
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण
संपादकीय

वि.स. खांडेकर लेखक आणि व्यक्ती

January 10, 2024
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
संपादकीय

सरकारचं ‌‘शेळीपालन’

January 10, 2024
पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर, तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना अद्याप एकही छदाम नाही
संपादकीय

उग्रवादाला मूठमाती मिळेल?

January 8, 2024
Next Post
मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांच्यासह ‘या’ खासदारांचे निलंबन

मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांच्यासह 'या' खासदारांचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?