• Login
Saturday, June 14, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

अफगाणबद्दलचे बदलते धोरण

Varsha Mehata by Varsha Mehata
September 9, 2021
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
अफगाणबद्दलचे बदलते धोरण

Herat area, members of the Taliban belonging to the Mullah Niazi group in the territory they control, inside the Mullah's stronghold

0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

भारताने 1996 ते 2001 या काळात तालिबान सरकारशी संबंध ठेवले नव्हते. त्यावेळी ते समर्थनीय होतं. परंतु, आता भारताला तालिबान सरकारशी राजनैतिक संबंध टाळता येणार नाहीत. अमेरिकेने तिथून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच सुरू केली होती. तेव्हापासून रशिया, पाकिस्तान, चीन अमेरिकेच्या अफगाणिस्तान सरकारसोबत वाटाघाटी सुरू असताना भारताला मात्र सुरुवातीपासून डावलण्यात येत होतं. तालिबान्यांनी केलेल्या हिंसक कृत्याचं कोणीच समर्थन करणार नाही. परंतु, आता भारताला तिथल्या नव्या सरकारशी कोणाचीही पर्वा न करता जुळवून घ्यावं लागेल. त्याचं कारण म्हणजे अफगाणिस्तानचं भू-राजकीय स्थान. तालिबानला कोणत्याही परिस्थितीत मान्यता देणार नाही, असं सांगणारं मोदी सरकार आता मात्र तालिबानशी चर्चा करायला लागलं आहे. पूर्वीची भूमिका योग्य की आताची, यावर टीका होऊ शकते. गेल्या वीस वर्षांमध्ये अफगाणिस्तान हा भारताचा सच्चा मित्र होता. भारताने तिथे तीनशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करून विविध विकासकामं मार्गी लावली आहेत. सामान्य अफगाणी नागरिकांना भारताबद्दल प्रेम आहे. अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला मदत केली असली, तरी सरकार चालवायला आर्थिक आणि राजनैतिक मदत लागते. त्याबाबत पाकिस्तानवर फार भरवसा ठेवून चालणार नाही, याची जाणीव तालिबानला नाही, असं नाही. त्यामुळे तर तालिबानने चीन आणि भारताशी संबंध वाढवण्यासाठी हात पुढे केला आहे.
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या करझाई आणि घनी या दोन्ही अध्यक्षांच्या काळात भारताचे अफगाणिस्तानशी चांगले संबंध होते. आताही तालिबान सत्ता स्थापन करेल, तेव्हा त्या देशाचे अधिकृत सरकार म्हणून आपल्याला अफगाणिस्तानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. तसं न केल्यास आपण आपल्याच पायावर कुदळ मारून घेऊ, याची जाणीव मोदी सरकारला आहे. एकीकडे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तालिबानशी संबंध ठेवणार नाही, असं सांगत असताना दुसरीकडे मात्र कतारमधील दोहा इथे भारत सरकारने तालिबानी नेत्याशी चर्चा केली. त्यात गैर काहीच नाही. अफगाणिस्तानला चीन आणि पाकिस्तानच्या कह्यात जाऊ द्यायचं नसेल आणि अफगाणिस्तानमधली आपली वायू वाहिनी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही, याचं भान सरकारला आलं आहे. अफगाणिस्तानशी संबंधांवरुन भारताच्या गुप्तचर खात्याचं अपयश वारंवार पुढे आलं आहे. शेजारच्या देशात चालू असलेल्या घडामोडींची माहिती जमा करून त्याचं विश्‍लेषण करण्यात आपल्या गुप्तचर यंत्रणेला अपयश आलं आहे. तालिबानच्या गेल्या वर्षभरातल्या हालचाली, अमेरिकेने सैन्य माघारी घेण्याचं वेळापत्रक ठरवल्यानंतर तिथल्या सरकारचं आवाहन न जुमानता संपूर्ण सत्तेसाठी सुरू केलेलं आक्रमण आणि तालिबान अफगाणिस्तानचा ताबा किती दिवसांमध्ये घेईल, याचा अंदाज लावण्यात ‘रॉ’ अपयशी ठरली. कारगिल, गलवान खोर्‍यातील पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींचा अंदाजही ‘रॉ’ला लावता आला नाही.
तालिबानी प्रवृत्ती दोन दशकांपूर्वीची आहे. परंतु, आपण आपल्या जुन्याच भूमिकेला चिकटून बसलो तर मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे अमेरिका आणि ‘क्वाड’ काय म्हणतं यापेक्षा भारताची आणखी एक सीमा धोकादायक ठरू द्यायची नसेल तर तालिबानशी राजनैतिक संबंध वाढवणं आणि तिथे सरकार आल्यानंतर वाटाघाटी करणं यात शहाणपण आहे. अफगाणिस्तानला चीनकडून मदत हवी असली तरी तालिबानचा चीनवर फार विश्‍वास नाही. पाकिस्तानचा फारसा उपयोग होणार नाही, याचीही जाणीव तालिबानला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची कतार आणि तुर्कस्तानशी मैत्री वाढली आहे. भारताचेही कतारशी चांगले संबंध आहेत. कतारचा उपयोग करून तालिबानशी चांगले संबंध प्रस्थापित केले तर भारताने तिथे केलेली तीनशे अब्ज डॉलरची गुंतवणूक वाया जाणार नाही. शिवाय पाकिस्तानी अतिरेक्यांना अफगाणिस्तानची भूमी वापरून भारताविरोधात दहशतवादी कारवाया करता येणार नाहीत. पाकिस्तानचं सरकार आणि तिथल्या अतिरेकी संघटना भारतापासून काश्मीर मुक्त करू, असं दिवास्वप्न पाहत आहेत. त्या दिवास्वप्नांना तालिबानची मदत मिळणार नाही. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्याचं इसिसच्या खोरासन गटाला मान्य झालेलं नाही. त्यामुळे हा गटही तालिबानच्या विरोधात दहशतवादी कारवाया करण्याची शक्यता आहे. काबूल विमानतळावरच्या आत्मघाती हल्ल्याने त्याची चुणूक दाखवली आहे. सध्या तालिबानकडे देश चालवण्यासाठी पैसेच नाहीत. अमेरिकेतली रक्कम गोठवली गेली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेला न जुमानता तालिबानने पुढे केलेला मैत्रीचा हात हातात घेण्याचं धाडस भारताला दाखवावं लागेल. आपल्या सीमांची सुरक्षितता आणि गुंतवणुकीचा विचार करुन आपल्याला हे करावं लागेल. त्याची जाणीव झाल्यामुळेच भारताच्या तालिबानबाबतच्या धोरणात बदल होताना दिसत आहे. दोहा इथे भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्तानेकझई यांची घेतलेली भेट हा बदलत्या धोरणाचाच परिपाक आहे. भारत आणि तालिबान यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संपर्क आहे. मात्र, आता पहिल्यांदाच भारताने तालिबानशी चर्चा केल्याचं अधिकृतपणे मान्य केलं आहे. भारताने तालिबानशी चर्चा करणं हे परिस्थिती बदलल्याचं लक्षण आहे. सुरक्षाविषयक मुद्दे आणि अफगाणिस्तानमधल्या भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासंदर्भात तालिबानशी चर्चा झाल्याचं भारताने म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग भारतविरोधी कारवायांसाठी होऊ नये याची खबरदारी तालिबानने घ्यायला हवी, असं मित्तल यांनी तालिबानच्या प्रतिनिधींना सांगितलं आहे. काबूलमध्ये अद्यापही काही भारतीय अडकले आहेत. यामध्ये शीख समाजाच्या लोकांचाही समावेश आहे. त्यांना मायदेशी परतायचं आहे. भारताने 565 लोकांना परत आणलं आहे. त्यात 112 अफगाण नागरिकांचाही समावेश आहे.
भारताने मांडलेल्या सर्व मुद्यांवर सकारात्मक विचार करू, असं तालिबानने म्हटल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं. मित्तल यांनी शेर मोहम्मद अब्बास यांच्याशी चर्चा केली. अब्बास यांनी डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीतून प्रशिक्षण घेतलं आहे. भारत आणि अफगाणिस्तानने राजकीय आणि व्यापारी संबंध कायम राखावेत, असं मत अब्बास यांनी व्यक्त केलं होतं. अफगाणिस्तानमधून भारताला होणारी निर्यात ही आयातीच्या तिप्पट असून दोन्ही देशांमधला व्यापार बंद होणं दोघांसाठीही नुकसानीचं आहे. भारताला हक्कानी नेटवर्कबाबत चिंता आहे. ही संघटना तालिबानचाच भाग आहे. 2008-09 मध्ये तालिबानचे उपनेते सिराजुद्दीन हक्कानी भारतीय दूतावासावरील हल्ल्याप्रकरणी दोषी आढळले होते. भारताने तालिबान सत्तेत आल्यानंतर संबंध तोडलेले नाहीत. दोहा इथून अफगाणिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाईल, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलं होतं. भारतानेही हीच भूमिका स्वीकारली आहे. केंद्र सरकारने तालिबानशी चर्चादेखील सुरू केली आहे. तिथे सरकारची स्थापना झाल्यानंतर भारत त्याला मान्यता देऊ शकतो, असं ताज्या घडामोडींवरून दिसतं. ऑगस्ट महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे होतं. ऑगस्ट महिन्यातच अफगाणिस्तानमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. मात्र, तरीही भारताने तालिबानबाबत कठोर धोरण अवलंबलेलं नाही, यावरून भारताची भूमिका बदलायला अगोदरच सुरुवात झाली होती; फक्त ती खुलेपणाने मान्य केली जात नव्हती हे जाणवतं.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

पाऊस पुन्हा सक्रीय

Next Post

चाकरमान्यांच्या आगमनाने महामार्ग फुल्ल

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post
चाकरमान्यांच्या आगमनाने महामार्ग फुल्ल

चाकरमान्यांच्या आगमनाने महामार्ग फुल्ल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Saturday, 14
Sunday
+28° +26°
Monday
+28° +25°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+28° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.