। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड परिसरात जोरदार पाऊस बरसाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तर, शेतकरी वर्ग ही शेतीच्या कामाला लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 7 जुन नंतर संपूर्ण कोकणात जोरदार पावसाळा सुरुवात होईल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. तसेच, यावर्षी सरासरी पाऊस उत्तम प्रकारे होईल असे सांगितले होते. हा अंदाज खरा ठरत असून कोलाड-खांब परिसरात शनिवारी (दि.8) जोरदार पावसाला सुरुवात झाली असुन शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यात 98 हजार हेक्टर क्षेत्रात खरीब हंगामात भात शेतीची लागवड केली जाते यासाठी शेतकरी वर्ग भात पेरणी करण्यासाठी कामाला लागले आहेत.