दुसर्या लाटेने दीड कोटी बेरोजगार
लॉकडाउन अधिक त्रासदायक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या पाश्वर्र्भूमीवर लावण्यात येणार्या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. तसंच बेरोजगारीच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे. एका खासगी संशोधन संस्थेने याबद्दलचा अभ्यास केला आहे. त्यांच्या या अभ्यासानुसार, या वर्षी मे महिन्यात भारतातल्या जवळपास दीड कोटींहून अधिक लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. यामुळे देशातल्या बेरोजगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात देशातलं बेरोजगारीचं प्रमाण 7.97 टक्के होतं. मात्र या वर्षीच्या मे महिन्यामध्ये हेच प्रमाण 11.9 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही फार मोठी वाढ आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण 10.18 टक्के होतं. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी(उचखए)यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजगार असणार्यांपैकी शहरी भागातले जवळपास 14.73 टक्के तर ग्रामीण भागातले 10.63 टक्के लोक बेरोजगार झाले आहेत.
गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये कोरोनाच्या पाश्वर्र्भूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे 23.52 टक्के होता. मात्र पुढच्या महिन्यापासून हा दर कमी होऊ लागला. मे 2020 मध्ये देशातला बेरोजगारीचा दर 21.73 टक्क्यांवर पोहोचला. माहितीनुसार, मे मध्ये 37.545 कोटी लोकांकडे रोजगार आहे, तर एप्रिलमध्ये 39.079 कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. म्हणजेच मेमध्ये 1.53 कोटीहून अधिक लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत.