कोविड लस घेण्यासाठी प्रशासनाने आवाहन, नागरिकांनी खबरदारी घ्यावी
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या ओमिक्रॉन या विषाणूमुळे जिल्हयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हयात कोव्हिड लसीकरणला गती देण्यात येत आहे. ओमिक्रॉनचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही. तरीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.
कोरोना संसर्ग काळात नियमित मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व शारिरीक अंतर ठेवणे याची अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर कोविड लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात सध्या दररोज एक आकडी कोविड बाधित सापडत आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून कोविड लसीकरण फार महत्वाचे आहे. नागरिकांनी कोविड लस घेण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लसीकरणाने हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. नागरिकांनी लसीकरणात 100 टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस राहिला आहे, तो प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील ज्या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहेत. त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नियोजन करावे.
विलास पाटील,विभागीय आयुक्त
ऑक्सिजन निर्मितीवर भर द्यावा
कोकण विभागात सध्या किती ऑक्सिजन निर्मिती होत आहे. किती प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, याचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. त्याअनुषंगाने ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.