मुंबई : कारगील युद्धाला 23 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्मारक सदस्य आणि परिसरातील नागरिक यांनी वृक्षारोपण केले. यावेळी अतिशय दुर्मिळ असा वरूण अथवा वायवर्ण या वृक्षाचे रोपण करण्यात आले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले तसेच अन्य उपस्थितांनीही वृक्षाची रोपे लावली. या उपक्रमामध्ये पद्मजा सोनसुरकर,सीमा खोत, शीतल वाळके, भुभाताई बांदेकर, शुभदाताई, श्री राज, अभिषेक भाटकर, तसेच कुमारी आद्या आणि कुमार देवांश हे ही सहभागी झाले होते.







