श्रीवर्धन | आनंद जोशी|
यंदाच्या अतिवृष्टीमुळे महाड, तळीये, चिपळूण, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि घरांमध्ये व बाजार पेठांमध्ये पाणी शिरुन करोडोंचे नुकसान झाले. जीवितहानी आणि वित्तहानी अगदी कल्पनेच्या पलिकडची आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काळीज पिळवळून टाकणारा आक्रोश व निराधार वृद्ध महिला, लहान मुलांच्या असहाय्य किंकाळ्या ऱ्ह्यदय हेलावून टाकणा-या होत्या. महापूरग्रस्त भागास सरकार आणि विविध स्वयंसेवी संघटनांकडून सर्व प्रकारची मदत होत आहे. सामाजिक बांधिलकी नेहमीच जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने याही वेळी रोख रु. १२,८००/- व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरुपांतील मदत श्रीवर्धनच्या निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रज्ञा काकडे यांचेकडे तहसिल कार्यालयात जाऊन सुपूर्द केली. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी, उप प्राचार्य प्रा. निलेश चव्हाण, प्रा. सागर कुंभार व प्रा. शंकर भोईर उपस्थित होते.