लक्षवेधी लागत नसल्यावरुन नाराजी
| मुंबई | प्रतिनिधी |
रायगड जिल्हयातील रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पाच्या विरोधात जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी दाखल केलेली लक्षवेधी सभागृहात चर्चेसाठी न घेण्यावरुन शेकापचे आ.जयंत पाटील यांनी बुधवारी रुद्रावतार धारण करीत सरकारला धारेवर धरले. सरकार पण रिलायन्स धार्जिणे झाले का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधानपरिषदेत या मुद्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सेझ प्रकल्पावरुन रायगडातील जनतेचा आक्रोश मी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. मात्र तीनवेळा विधानमंडळ सचिवालयाला माहिती देऊन सुद्धा लक्षवेधी लागत नाही. हे सरकार पण रिलायन्स धार्जिणे झाले का ? असा संतप्त सवाल पाटील यांनी सभागृहात केला.
आमच्या सारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या लक्षवेधी सूचना विधानमंडळ सचिवालय घेत नाहीत, हे बरोबर नाही. माझा विधिमंडळ सचिवांवर आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. यावर कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारच्या कामकाज कार्यक्रम यादीमध्ये या लक्षवेधीला प्राधान्यक्रम द्यावा तशी सूचना मंत्र्यांना दिली जाईल,असे सांगितले.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.