• Login
Tuesday, June 10, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

अमेरिका-भारताचे वाढते संबंध

Varsha Mehata by Varsha Mehata
March 9, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा. डॉ. विजयकुमार पोेटे

अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये कितीही मतभेद असले तरी त्यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत आहेत, याबाबत शंका नाही. एकीकडे रशियाशी मैत्रीसंबंध जपताना अमेरिकेशीही मैत्री वाढवण्याची कसरत भारत लिलया पार पाडत आहे. अमेरिका आणि भारतातील व्यापारी संबंध देशासाठी फायद्याचे आहेत तसेच बदलत्या जागतिक परिस्थितीत व्यूहात्मकदृष्ट्याही महत्त्वाचे आहेत.

भारताने केलेल्या आण्विक चाचण्यांनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. त्याला आता अडीच दशकांचा काळ उलटून गेला आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि अमेरिका अधिकाधिक जवळ येत आहेत. परराष्ट्र धोरणांतर्गत मुत्सद्देगिरी सांगते की दर्जा वधारत असणार्‍या आणि उज्ज्वल भविष्याची मोठी शक्यता असणार्‍या देशाशी असणारे संबंध सतत दृढ व्हायला हवेत. आज भारताची जागतिक परिस्थिती अशीच आहे. त्यामुळेच जगातील सर्वात मोठ्या शक्तीलाही भारतासोबतचे संबंध सुधारायचे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाकडून अशी अनेक विधाने अलिकडे समोर आली आहेत, ज्यावरुन अमेरिकेला भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यात रस असल्याचे स्पष्ट होत आहे. थोडक्यात, अमेरिकेसाठी भारताचे महत्त्व वाढत आहे.
अमेरिकन प्रशासनाच्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून भारत अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे की, अमेरिकेसाठी भारत अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा भागीदार आहे. त्यांच्या मते व्यापार, सुरक्षा, सहकार्य आणि तांत्रिक सहकार्य आदी क्षेत्रांमध्ये अमेरिकेला भारताचे विशेष महत्त्व जाणवते. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडेन यांच्यात जपानमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान एआय, क्वाटंम काँप्युटींग, फाईव्ह जी, सिक्स जी, बायोटेक, स्पेस आणि सेमीकंडक्टर्स यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांचे सरकार शिक्षण आणि उद्योग यासंदर्भात मजबूत संबंध प्रस्थापित करण्यावर भर देईल, असे निश्‍चित झाले आहे. साहजिकच येत्या काळात प्रगत तंत्रज्ञानाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढेल आणि हार्डवेअर क्षमतेमध्ये गुंतवणुकीच्या शक्यताही चांगल्या असतील.
येत्या काळात दोन्ही देशांदरम्यान शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणार्‍या क्वांटम तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त रोडमॅप बनवण्याबाबत एक करार होणे अपेक्षित आहे. या उपक्रमाद्वारे दोन्ही देश एकमेकांच्या अनुभवांचे आदानप्रदान करून अंतराळ तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवतील. सीमावादात अमेरिका भारतासोबत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कोणत्याही प्रक्षोभक कारवाईच्या विरोधात असल्याचे अमेरिकेने अनेकदा स्पष्ट केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये अमेरिकेने अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याच्या चीनी लष्कराच्या प्रयत्नांना चुकीचे म्हटले होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनी सैन्यासोबत भेट घेतल्याच्या वृत्तानंतर पटेल यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की, अमेरिका सीमेपलीकडून किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी किंवा नागरी घुसखोरी खपवून घेणार नाही.
प्रादेशिक दावे पुढे नेण्याच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांना अमेरिका तीव्र विरोध करते. आता चीनकडून एकतर्फी प्रयत्न झाल्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे उघडपणे सांगण्यास अमेरिका मागेपुढे पाहत नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणावाबरोबरच शिथिलताही होती. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक स्तरावर सातत्याने भारताचा दर्जा वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्था  जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मानव संसाधनाच्या बाबतीत भारत लवकरच चीनला मागे टाकणार आहे. या दृष्टिकोनातून भारताकडे मोठी देशांतर्गत बाजारपेठ असल्याचा फायदा अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही घ्यायचा आहे. भारताकडे कुशल मनुष्यबळाची मोठी ताकद असून ती कोणत्याही देशात जाऊन तिथल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. ही बाबही अमेरिकेला खुणावणारी आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेचा चीनसोबतच्या व्यापारासह अनेक मुद्द्यांवरून संघर्ष वाढत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचे वर्चस्व मोडीत काढण्याच्या दृष्टिकोनातूनही भारत  अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे.
भारत जगातील शक्तिशाली आंतरराष्ट्रीय मंच असणार्‍या ‘जी-20’ आणि ‘शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन’चा अध्यक्ष आहे. भारत प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर विकसित आणि कमी विकसित देशांचा बुलंद आवाज म्हणून उदयास येत आहे. आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या विचारांकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. अमेरिकेलाही भारताच्या या भक्कम स्थितीचा फायदा उठवून आपले जागतिक हीत साधायचे आहे. द्विपक्षीय सहकार्याची वाढती परिमाणे लक्षात घेऊन अमेरिकेला भारतासोबत व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवायचे आहे. त्यामुळेच भारत आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमध्ये एकमेकांना प्राधान्य दिलं जात आहे. दुसरीकडे, मजबूत होत असणारे लष्करी संबंध एकमेकांवरील विश्‍वास आणखी दृढ करत असल्याचेही दिसते.
अमेरिका आणि भारताने व्यापार, गुंतवणूक आणि कनेक्टिव्हिटीद्वारे जागतिक सुरक्षा, स्थैर्य आणि आर्थिक समृद्धीला प्रोत्साहन देण्यात नेहमीच स्वारस्य दाखवले आहे. अलिकडच्या काळात यामध्ये वाढ झाली आहे. भारत-अमेरिका संबंधांच्या दृष्टीने 2022 हे वर्ष ऐतिहासिक ठरले. आता दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांनाही 75 वर्षे झाली आहेत. 2022 मध्ये मोदी आणि बायडेन यांची दोनदा भेट झाली. मे 2022 मध्ये टोकियो येथे ‘क्वाड’ देशांच्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. तर नोव्हेंबर 2022 मध्ये दोन्ही नेते दुसर्‍यांदा इंडोनेशियातील बाली येथे संपन्न झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भेटले. याशिवाय वॉशिंग्टनमध्ये ‘टू प्लस टू’ मंत्रिस्तरीय बैठकाही झाल्या. 2022 मध्ये भारतात पहिल्यांदाच अमेरिकन नौदलाच्या जहाजाची देखभाल करण्यात आली. यावर्षी बाजारपेठेतील काही जुन्या समस्यांचे निराकरणही करण्यात आले. गुंतवणूक प्रोत्साहन करारावर स्वाक्षरीही करण्यात आली. ही सगळी पावले एकत्र येण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली, असेच म्हणावे लागेल.
आर्थिक आघाडीवर गेले वर्ष खूप चांगले होते. आता दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. अशी अपेक्षा आहे की, या वर्षामध्ये जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाहीमधील संबंध अधिक घट्ट होतील. तेच संपूर्ण जगासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचं भविष्य ठरवतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंधही दर वर्षी घट्ट होत आहेत. अमेरिका भारतासोबत पारंपरिक आणि न्याय्य व्यापारसंबंध विकसित करु इच्छिते. सध्या अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यात 88.75 अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला. 2018-19 मध्ये तो 87.96 अब्ज डॉलर होता. 2020-21 मध्ये परस्पर व्यापार 80.51 अब्ज डॉलर होता. 2021-22 मध्ये अमेरिका चीनला मागे टाकून भारताचा अव्वल व्यापारी भागीदार बनला. यावरूनही भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यावसायिक संबंधांचे दर्शन घडते. या वर्षी आत्तापर्यंत दोन्ही देशांमध्ये 119.42 अब्ज डॉलरचा व्यापार झाला. हा भारताच्या एकूण व्यापाराच्या 11.5 टक्के आहे. भारताच्या शीर्ष दहा व्यापार भागीदारांपैकी अमेरिका हा महत्वाचा देश असल्याचेही लक्षात घेण्यासारखे आहे. म्हणजेच भारताचे व्यापार संतुलन सकारात्मक आहे.
2021-22 मध्ये भारताचा अमेरिकेसोबत 32.8 अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष होता.  2013-14 आणि 2017-18 दरम्यान चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. 2020-21 मध्येही हीच परिस्थिती होती. चीनच्या आधी संयुक्त अरब अमिराती हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. आता मात्र ती जागा अमेरिकेने घेतली आहे. भारत अमेरिकेने सुरू केलेल्या ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’मध्ये सामील झाल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध वेगाने वाढले आहेत. 2022-23 दरम्यान दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आधीचे सर्व विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे. भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाच्या माध्यमातून परस्पर व्यापार आणि गुंतवणूकही वाढत आहे. हे सगळे संकेत हे दोन मोठे देश समान व्यासपीठावर येत असल्याचे सूचित करतात. 

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

आपली आर्थिक स्थिती

Next Post

आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post
आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड

आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 10
Wednesday
+31° +28°
Thursday
+30° +29°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +29°
Sunday
+30° +28°
Monday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.