• Login
Sunday, March 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

तयारी सुरु झाली

Varsha Mehata by Varsha Mehata
July 11, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्तर प्रदेशामध्ये पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने टोमॅटोच्या भाववाढीचा निषेध करण्यासाठी अभिनव प्रकार केला. एका भाजीच्या दुकानाच्या बाहेर टोमॅटो चोरीला जाऊ नयेत म्हणून खास पहिलवान पहारेकरी नियुक्त करून त्याने त्याचे फोटो व्हायरल केले. पण योगी सरकारला हा विनोद आवडला नाही. पोलिसांनी या कार्यकर्त्याविरुध्द समाजात द्वेषभावना पसरवत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. देशात प्रत्यक्ष आणीबाणी लागू नसली तरी आपण सर्व कसे एका हुकुमशाही पोलिसी राजवटीकडे वाटचाल करीत आहोत याचे हे विदारक उदाहरण आहे. हे योगी नरेंद्र मोदींनंतरचे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे म्हणतात आणि पुढचे पंतप्रधान तेच होतील असे त्यांच्या भक्तांना वाटते. नरेंद्र मोदी राजवटीच्या काळात हिंदू धर्मवादी शक्तींनी देशातील न्यायपालिका, निवडणूक आयोग, पोलिस, प्रशासन अशा सर्व यंत्रणा पूर्णतः पोखरल्या आहेत. शिक्षणामध्येही त्यांनी हैदोस घातला असून या देशातील संस्कृती आणि इतिहास एकाच भगव्या हिंदू रंगात रंगवण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. माध्यमांवर त्यांचाच ताबा आहे. त्याद्वारे बहुसंख्य जनतेची बुध्दी भ्रष्ट करण्याचे प्रयत्न रोजच्या रोज चालू आहेत. त्यातून मोदी-भक्त आणि धर्मांध हिंदूंच्या अत्यंत हिंस्र टोळ्या तयार झाल्या आहेत. आपल्या विरोधी मत मांडणाऱ्यांवर या टोळ्या हल्ले चढवतात. त्यांना एकटे पाडतात. पोलिसांकरवी त्यांच्यावर खोटे खटले दाखल करतात. राजकीय विरोध करणाऱ्यांना वेगवेगळ्या चौकशांमध्ये अडकवले जाते. यामुळे प्रस्थापित म्हणवणारे भलेभले पक्ष डगमगून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुरोगामी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांनी पुण्यात भरवलेले सत्ता परिवर्तन शिबिर हे अत्यंत गरजेचे आणि आश्वासक पाऊल म्हणायला हवे. शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, समाजवादी पक्ष इत्यादींनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत स्वागतार्ह आहे.

तत्वांची किंमत

गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांचे एकत्र येण्याचे व संयुक्त मोर्चा स्थापण्याचे प्रयत्न चालू होते. मध्यंतरी मुंबईत याबाबत बैठका झाल्या. पुण्यातील कार्यकर्त्यांचे शिबिर हा त्याचाच पुढचा टप्पा होय. या सहभागी पक्ष व संघटनांची विशिष्ट अशी विचारसरणी आहे. डाव्या विचारांच्या अनेक छटांचे दर्शन त्यांच्यात होते. त्याबाबत त्यांचे तात्विक मतभेद आहेत व त्या मतभेदांनाही अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र धर्मांध शक्तींना विरोध हा त्यांच्यातला समान धागा आहे. मधल्या काळात राज्याचे राजकारण कल्पनेच्या पलिकडे बदलले आहे. तत्व, निष्ठा या गोष्टी खुंटीला टांगून ठेवल्या गेल्या आहेत. सत्ता मिळवणे हे एकमेव ध्येय उरले आहे. विकास करण्यासाठी आम्ही सत्तेत आलो असे निर्लज्ज समर्थन गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी केले तर यंदा अजितदादा करीत आहेत. त्याला हिंदुत्व किंवा शरद पवारांचे धरसोडीचे धोरण अशा सबबींची जोड दिली जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकहाती जिंकणे हे भाजपचे ताबडतोबीचे ध्येय आहे. देशाला हिंदुत्ववादी करण्याच्या त्यांच्या प्रकल्पासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच विरोधकांमध्ये फूट पाडून दुबळे केले जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी हा भाजपला सणसणीत पर्याय ठरतो आहे असे लक्षात येताच अजितदादांच्या गटाला फोडण्यात आले. भाजपच्या हुकुमशाहीची पकड घट्ट होत चाललेली असताना प्रमुख विरोधी नेत्यांनी त्याविरुद्ध लढावे अशी जनतेची अपेक्षा होती. पण त्यांनी निराशा केली आणि स्वतःची कातडी वाचवण्याचा पवित्रा घेतला. आजवर फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन मते मिळवणारे हे राजकारणी किती लबाड आणि भित्रे आहेत याचे दर्शन जनतेला रोजच्या रोज घडत आहे. तुम्ही जी तत्वे सांगता त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही किती किंमत मोजायला तयार आहेता यावरच तुमची व त्या तत्वांची महत्ता ठरत असते. दुर्दैवाने राज्यातल्या नेत्यांनी भाजपला शरण जाऊन आपल्या तत्वांची किंमत मातीमोल केली आहे. अशा निराशेच्या वातावरणात पुरोगामी पक्ष मात्र आपला झेंडा घेऊन रस्त्यावरच्या संघर्षाला तयार आहेत.

ऐतिहासिक भूमिका

प्रागतिक पक्षांना त्यात अनेक आघाड्यांवर तोंड द्यावे लागेल. भाजपच्या धर्मांधतेला विरोधाचे सूत्र कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही याची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. पुण्यातील शिबिरात सर्वांनीच यावर मतैक्य व्यक्त केले. निवडणुकीच्या राजकारणात भाजपला शह देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र विकास आघाडीसोबत युती करावी लागणार आहे. आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या भांडवलवादी धोरणांशी सर्वच परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी कित्येक दशके लढाई केली आहे. त्यामुळे शेकाप असो की कम्युनिस्ट, अनेक भागांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस वा राष्ट्रवादी हाच राहिला आहे. काही वेळेला त्यांच्याशी मैत्री केली तरीही डाव्यांचा त्यांच्याविषयीचा अनुभव चांगला नाही. गेल्या वेळी, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी रायगडात जो विश्वासघात केला त्याचे उदाहरण भाई जयंत पाटील यांनी या शिबिरात सांगितलेच. पण तरीही परिस्थितीची गरज म्हणून त्यांच्यासोबत जावे लागणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद बरीच कमी झाली आहे. याची जाणीव कदाचित त्यांना करून द्यावी लागेल. कारण, सत्ता अजूनही आपल्याकडेच आहे असा त्यांचा तोरा असतो. खरे तर, त्यांना डाव्यांची कधी नाही इतकी गरज आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वाटाघाटीत त्यांनी नमते घेणे आणि नंतर ठरलेल्या समझोत्याचे मनापासून पालन करणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. हे घडले नाही तर सर्वांचेच नुकसान होणार आहे. भाजपला अटकाव करण्याच्या लढाईत ज्या नैतिकतेची गरज आहे ती प्रामुख्याने डाव्यांकडे व काही प्रमाणात काँग्रेसकडेच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अधूनमधून भाजपशी जुळवून घेण्याचा पवित्रा घेतलेला असल्याने त्यांना आपली नैतिकता सिध्द करावी लागेल. या स्थितीत भाजपविरोधी संभाव्य आघाडीला ताळ्यावर ठेवण्याचे मोक्याचे काम केवळ डावेच करू शकतात. पूर्वी केंद्रात हरकिशनसिंग सुरजित यांनी अशी जबाबदारी पार पाडली होती. २०२४ च्या निवडणुका अनेक अर्थांनी ऐतिहासिक असतील. त्यावेळी प्रागतिकांची भूमिकाही तशीच ऐतिहासिक ठरावी.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

राजकारण्यांची कलंकशोभा आरोपांची राळ, कलगीतुरा

Next Post

मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा सुटणार; आजच शपथविधी होणार

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा सुटणार; आजच शपथविधी होणार

मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा सुटणार; आजच शपथविधी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?