वहुर आणि विन्हेरे विभागातर्फे मुंबईत शोकसभा ..!
। मुंबई । वार्ताहर ।
महाडचे धडाडीचे नेतृत्व माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आठवणीने मुंबईस्थित महाडवासिय देखील गहिवरुन गेले. त्याना आदरांजली वाहण्यासाठी वहुर आणि विन्हेरे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वपक्षीय मुंबईकरांच्या वतीने पहिल्यांदाच मुंबईत पर्लसेंटर हॉल दादर येथे शोकसभा घेण्यात आली होती.
प्रास्ताविकात मिलिंद चिबडे यांनी माणिकरावांचा जीवनपट उलगडून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या, उपस्थितांनी विविध प्रसंगांच्या, आठवणींच्या वक्तव्यातून स्पष्टवक्ता, विकासाची दूरदृष्टी व उच्च विद्याविभूषित, प्रशासन व राजकारण यामध्ये तरबेज असलेले धुरंदर नेते प्रशासकिय दबदबा व हुशार व्यक्तीमत्वाला महाडवासीय गमावून बसले असल्याचे कार्यकर्त्याला स्वर्ग.माणिक जगताप गेल्याचे अतिव दुःख झाल्याची भावना उपस्थितांमधून जाणवली.
यावेळी संपर्क प्रमुख इक्बालशेठ चांदले, सहसंपर्कप्रमुख एकनाथ सुकूम, संतोष फिलसे, दिपक महाडिक, दत्ताभाई देवळे, अनंत महाडकर, मधुकर शिर्के, पत्रकार शिवराज पार्टे, विशाल गोलांबडे, समीर रेवाळे, किशोर धाडवे,अमोल पवळेकर, बबन भुवड, मनोहर बर्वे, संतोष अडखले, सत्यवान यादव, प्रसाद धारशे, अतुल वाडकर, आदिंसह विविध सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या शोकसभेचे आयोजन केले.