संबंधित खात्याचे दुर्लक्ष
| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील माडप-खरसुंडी या मार्गावरील असलेले हे धोक्याचे ठरत असून, या मार्गावरून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताची मालिका सुरुच आहे.
माडप गावापासून दोन कि.मी. खरसुंडी येथे माध्यमिक शाळा, तसेच नव्याने निर्माण झालेली लहान मुलांची शाळा असून, माध्यमिक शाळेत विद्यार्थी चालत जाणे पसंत करीत असतात. शाळेत लहान मुले खासगी वाहनाने प्रवास करीत असतात. परिणामी, हा वळणाचा रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या वळणाचा माहिती देणारा साधा सूचना फलकसुद्धा बसविण्याची तसदी संबंधित खात्याने घेण्यात आलेली नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षात खरसुंडी वळण आता हे अपघात प्रवण क्षेत्र ठरत आहे.