न्यायालयाकडे अहवाल सुपूर्द
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मागील तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या एसटी संपाबाबत आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांचे प्रमुख मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जवळपास ४१ टक्क्यांची पगारवाढ देऊन नोकरीत पुन्हा रूजू होण्यासाठी आवाहन केलं. त्यानंतरही काही संघटना संपावर ठाम आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने संप चालू ठेवायचा, की मागे घ्यायचा यावर मोठा निर्णय येणं अपेक्षित होता.
दरम्यान, एसटी महामंडळचा राज्य सरकार मध्ये विलीनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल रात्री उशिरा मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. यासंदर्भात राज्य सरकारचे वकील पिंकी भन्साली यांनी माहिती दिली.