• Login
Sunday, January 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विधिमंडळातील बुलंद आवाज..

Santosh Raul by Santosh Raul
July 7, 2023
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड, लेख, संपादकीय
0 0
0
अलिबागच्या मासळी व्यवसाय संकुलासाठी पुरेसा निधी
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेते स्व. नारायण नागू पाटील, रायगडच्या राजकारणात ठसा उमटविणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व स्व. प्रभाकर पाटील आणि विधिमंळातील बुलंद आवाजाने सभागृह दणाणून सोडणारे स्व. ॲड. दत्ता पाटील यांचा वैचारिक वारसा शेकापचे सरचिटणीस आ. जयंतभाई पाटील यांनी यशस्वीपणे पुढे नेला आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर शेकापची ही मुलूखमैदानी तोफ राज्याच्या राजकारणात कायमच धडाडत राहिली आहे. राजकारणातच नव्हे, सहकार चळवळीसह शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आज आ. जयंतभाई पाटील वयाच्या 69 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या या बुलंद आवाजाची धार राज्याच्या राजकारणात आणखीन तेज होवो, ही शुभेच्छा!

शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंतभाई पाटील यांना शेतकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा कै. नारायण नागू पाटील यांच्याकडून मिळाला. शेतकऱ्यांची चळवळ उभारुन आंदोलन करणारे श्रमजीवी जनतेचे झुंजार नेते म्हणून ना.ना. पाटील ओळखले जायचे. त्यांच्या घरात शेतकरी व कष्टकरी यांचे राजकारण चालत असे. त्यामुळे गरिबांची दु:ख, त्यांचे हाल त्यांनी लहानपणीच पाहिले होते. पुढे हाच वारसा त्यांचे सुपुत्र प्रभाकर नारायण पाटील यांनी यशस्वीपणे सांभाळला. प्रभाकर पाटील यांनी वडील ना.ना. पाटील यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व यांमुळे प्रभावित होऊन राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने व अभ्यासूवृत्तीने अनेक सभा गाजविल्या. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. पुढे ग्रामपंचायत, पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकून, त्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली. सहकारी चळवळ रुजवली. तर, दुसरीकडे डाव्या विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व दीर्घकाळ कै. ॲड. दत्ता पाटील यांनी केले. निष्णात फौजदारी वकील अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी गरीब, शेतकरी, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने विधानसभेत आवाज उठविला. आपल्या वकिलीच्या बळावर जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत केले. स्थानिक भूमीपुत्र, मच्छिमारांचे प्रश्न ऐरणीवर आणत शेकापची रायगड जिल्ह्यात भक्कम तटबंदी उभारण्यात त्यांना त्याकाळी प्रभाकर पाटील, दि.बा. पाटील यांनी मोलाची साथ दिली.

दत्ता पाटील यांनी 27 वर्षे विधानसभेत अलिबाग-उरण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. धारदार वक्तृत्व, हजरजबाबीपणा यांच्या जोरावर, संसदीय आयुधांचा अचूक वापर करीत त्यांनी विधानसभा गाजवली. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी रायगडसह कोकणात शाळा, कॉलेजचे नेटवर्क उभारुन, उच्च व्यावसायिक शिक्षणाच्या संधी निर्माण करुन दिल्या. आजोबा नारायण नागू पाटील, वडील प्रभाकर नारायण पाटील आणि काका ॲड. दत्ता पाटील यांचा हा वारसा शेकाप नेते आ. जयंतभाई पाटील, मीनाक्षी पाटील आणि पंडितशेठ पाटील यांनी समर्थपणे पेलला. घरातील ज्येष्ठांकडून त्यांना राजकारण, समाजकारणाचे बाळकडू मिळाले. प्रभाकर पाटील यांची नाळ ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी घट्ट जोडलेली होती. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना ते खूप जवळचे वाटत. आपल्या वडिलांना लोकांचे प्रश्न सोडविताना पाहातच आ. जयंत पाटील मोठे झाले. त्यामुळे हेच ग्रामीण कार्यकर्ते पुढे आ. जयंतभाई पाटील यांच्याशी जोडले गेले.

रायगड जिल्हा परिषदेतून ते थेट विधान परिषदेवर निवडून गेले. गेली 24 वर्षे ते विधान परिषदेत शेकापचे नेतृत्व यशस्वीपणे करीत आहेत. त्यांच्या संसदीय कौशल्याची चुणूक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, ती उल्लेखनीय अशीच आहे. संख्याबळाच्या बाबतीत शेकाप इतर पक्षांच्या तुलनेत कमी असला तरी, राजकीय कौशल्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर बिनविरोध, तर कधी निवडणूक लढवून शेकाप नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळात बसण्याचा मान मिळवला.
प्रभावी व्यक्तिमत्त्व, वक्तृत्वासह संसदीय आयुधांचा योग्य वापर करीत आ. जयंतभाई पाटील विधिमंडळ कामकाजात नेहमीच सक्रीय राहिले आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांमुळे ते राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले. विधिमंडळात विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी पक्षांना त्यांची नेहमीच दखल घ्यावी लागली. विधिमंडळात शेकाप हा सुरुवातीपासूनच, बहुतांश काळ विरोधात होता. अपवाद ठरले ते 1978 साली आलेले पुलोद सरकार आणि 1999 साली आलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्षांचे संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार. हे सत्तेत येण्याचे अल्पकालीन अपवाद वगळता महाराष्ट्र विधिमंडळात शेकाप विरोधी बाकावर बसला. असे असले तरी एका समर्थ, आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका शेकाप नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापने चोख बजावली आहे.

विधिमंडळात शेकापचा आवाज सुरुवातीपासूनच प्रभावी राहिला आहे. त्याला कारण शेकापचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आहेत. कृष्णराव धुळप, दि.बां. पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, ॲड. दत्ता पाटील यांच्यासारख्या शेकाप नेत्यांनी विधिमंडळात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. तोच वारसा गेली 25 वर्षे शेकाप नेते आ. जयंतभाई पाटील यांनी यशस्वीरित्या पुढे नेला आहे. आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वाने त्यांनी सभागृहाला नेहमीच दखल घ्यायला भाग पाडले आहे. म्हणूनच संख्याबळ कमी असले तरी राज्याच्या राजकारणात शेकापचा नेहमीच दबदबा राहिला आहे. कोणत्याही राज्याच्या राजकारणात विरोधी दबावगट महत्त्वाचा असतो. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडून, त्या प्रश्नांची दखल घेऊन सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडण्याचे काम आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापने चोख बजावले आहे. किंबहुना, सक्षम विरोधकाची भूमिका शेकापने समर्थपणे पार पाडली आहे.

शेकापच्या संघटनात्मक पातळीवर विचार केला तर आ. जयंत पाटील यांनी पक्षाचे जिल्हा चिटणीस ते पक्षाचे सर्वोच्च सरचिटणीस पदावर केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे. जिल्ह्यासह राज्यस्तरावरील सर्वपक्षीय नेत्यांशी असणारा थेट संपर्क, तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटणारा आधार यामुळे पक्षसंघटनेत आ. जयंतभाईंविषयी जवळीक आणि विश्वास वाटतो, ही जमेची बाजू आहे. आमदार भाई जयंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

– ॲड. प्रसाद पाटील

Related

Tags: alibagbhai jayant patilindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermlc jayant patilmumbaionline marathi newspwppwp newsraigadskpskp news
Previous Post

द्वारकानाथ मोकल यांचे निधन

Next Post

प्रगल्भ राजकारणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मुंबई इंडियन्सचे जबरदस्त पुनरागमन
क्रीडा

मुंबई इंडियन्सचे जबरदस्त पुनरागमन

January 11, 2026
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
खालापूर

पालकांसह शासनाची फसवणूक करणाऱ्या शाळेवर कारवाईची मागणी

January 11, 2026
कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा
रायगड

कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा

January 11, 2026
पद्मदुर्गावर अवतरली शिवशाही
मुरुड

पद्मदुर्गावर अवतरली शिवशाही

January 11, 2026
पनवेल आगारातील पाणपोई बंद
पनवेल

पनवेल आगारातील पाणपोई बंद

January 11, 2026
ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
अलिबाग

ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

January 11, 2026
Next Post
कडव्या डाव्या विचारसरणीचा नेता

कडव्या डाव्या विचारसरणीचा नेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?