आमदार जयंत पाटील यांची ग्वाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकर्यांचे नेते स्व.नाना पाटील आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरी येथे भव्यदिव्य स्मृती स्मारक उभारण्याची ग्वाही शेकाप सरचिटणीस आ जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी रविवारी वाघ्रण येथील वास्तूशिल्पकार, पेंटर कृष्णा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना सोबत घेऊन चरी येथे नाना पाटील (आप्पासाहेब )यांच्या स्मृती मंदिरास भेट देऊन अनेक ग्रामस्थांसंसोबत विचार विनिमय केला.
यावेळी खारेपाटतील ग्रामस्थांनी आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शेतकर्यांच्या संपामुळे खोती कारभार संपला,कुळ कायदा बदलावा लागला, कसेल त्याला जमिनी मिळाल्या आहेत.त्यामुळे आप्पासाहेब हे शेतकर्यांचे दैवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या भूमीत आप्पासाहेब यांच्या सोबत आले. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आले आणि शेतकर्यांचा लढा प्रभाविपणे कठीण प्रसंगात लढून यशस्वी केला खारेपाटातील सगळ्या शेतकर्यांनी आप्पासाहेबांच्या पाठीशी राहून ऐतिहासिक लढा यशस्वी करून दाखवला त्याचे उपकार आणि ऋण कधीच फेडता येणार नाही त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य असे आप्पासाहेबांचे स्मारक व्हावे अशी विनंती केली. यावेळी आ.जयंत पाटील यांनी चरी येथे भव्य दिव्य असे स्मारक आपसाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब यांचे निर्माण करून तरुण पिढीला या असामान्य नेत्यांचे केलेले अनमोल कार्य स्फूर्ती देईल आणि आपल्या सगळ्यांचे श्रद्धा स्थान निर्माण करू असे संगितले