मुंबई – गोवा महामार्गावर अपघात; चार जण गंभीर जखमी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज गावच्या हद्दीत टोल नाक्यापासून काही अंतरावर मारुती सेलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी लवेल येथील घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खेड येथून चिपळूणकडे भरधाव वेगाने जाणारी मारुती सेलेरो कार महामार्गावरील बोरज गावच्या हद्दीत असलेल्या टोलनाक्याजवळ आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणार्‍या कंटेनरवर जावून आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाचाही कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरही महामार्गाच्या डाव्या बाजूला गटारात जाऊन दरडीला धडकला. या अपघातात सेलेरो कार मधील यशवंत जयराम कदम (71), रंजना रमेश आंब्रे (55) रमेश आंब्रे (65) आणि वेदांकी विनोद कदम हे चौघे गंभीर जखमी झाले.

Exit mobile version