ठाकरे सरकार कोसळल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात ‘यांची’ लागणार वर्णी

| मुंबई | प्रतिनिधी |
उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपमध्ये नव्या सरकारसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी शिवसेनेसोबत तर आता शिंदे गटासोबत युती करून फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा सरकारला शिंदे गटाच्या 50 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या गटाला मंत्रिमंडळात मोठं प्रतिनिधित्व मिळणार आहे.

शिंदे गटातून कोणाची वर्णी?
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपाचे 28 तर शिंदे गटाचे 12 मंत्री असतील. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, दीपक केसरकर, शंभूराज देसाई या शिंदे गटाच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर बच्चू कडू, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ आणि भारत गोगावले या शिंदे गटातील मंत्र्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

भाजपामधून कोणाची वर्णी?
भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रिपदासाठी मोठी चुरस आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं कॅबिनेट मंत्रिपदासाठी नक्की मानली जात आहेत. त्याचबरोबर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर यांचीही नावं कॅबिनेट मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर राज्यमंत्रीपदासाठी नितेश राणे, प्रशांत ठाकूर, मदन येरावर, निलय नाईक, गोपीचंद पडाळकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version