| नवी दिल्ली | वार्ताहर |
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विंडीजवर दणदणीत विजय मिळविला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो यशस्वी जस्वाल. त्याने पदापर्णातच दमदार शतक ठोकून सगळ्यांची वाहवा मिळविली. कर्णधार रोहित शर्मानेही त्याचे कौतुक केले. तो म्हणाला की, यशस्वीमध्ये प्रतिभा आहे त्याने यापूर्वी दाखवून दिले की तो तयार आहे.
मात्र, त्याने या सामन्यात ज्या हुशारीने फलंदाजी केली ती कौतुकास तो पात्र आहे. मी त्याच्या संयमाची परीक्षा घेतली आणि तो कोणत्याही परिस्थितीत घाबरला नाही. आमचे संभाषण फक्त त्याला आठवण करून देण्यासाठी होते की तू त्यास पात्र आहेस. तू आधी खूप मेहनत केली आहे आणि आता इथे फक्त ते अंमलात आणायचे आहे आणि खेळाची मजा घेत फलंदाजी करायची आहे.