|चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण येथील आलेल्या महापूरात चिपळूणकरांचे भयावह असे नुकसान झाले आहे.म्हणून येथील पूरग्रस्तांना मदत करणेसाठी ऐरोली,नवी मुंबई येथील धर्मयोध्दा शंभूराजे युवा संस्था ट्रस्ट हे मेणबत्त्या,तांदुळ,कडधान्य,पाण्याची बॉटल,बेडशीट,चादर ,सुका मेवा,टॉवेल,काडी पेटी,औषध असा एक किट तयार करून पूरग्रस्तांच्या घरोघरी जाऊन देत होते.यावेळी संस्थेचे पदाधिकारी अमोल निंबाळकर,नितीन घार्गे,रोहित सांळुखे,मंगेश भोसले,सागर निंबाळकर,किरण साळुखे,सुनील धनावडे,तेजस राजेशिर्के,श्रेयस राजेशिर्के , भरत कदम विकास डबडे,समीर खोत विक्रम यादव,संजय कचरे,उमेश घनवट हे सर्व उपस्थित होते.तसेच चिपळूणच्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा राजेशिर्के येथे उपस्थित होत्या.